शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबतच शेतकऱ्यांवर किडीचे मोठे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक कोपामुळे तोंडचा घास हिरावण्याची भीती : बळीराजा चिंतातूर

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की बागायती, शेतात धान असो की भाजीपाला, आज निसर्गाच्या कोपामुळे कुणाचेच चालेना. पोशिंद्यांना चहुबाजूंनी वार सहन करावे लागतात. यावर्षी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. काकडी, टरबूजसारखे वेलवर्गीय पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानालाही किडीने ग्रासले. १५ दिवसात पीक घरात येणार होते ते आता येईल याची शाश्वतीच उरली नाही. बळीराजाचे स्वप्न भंगणार अशीच चिन्ह आहेत.शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे. धानाची पूर्ण उगवण झाल्यानंतर सर्व ओंब्या पांढऱ्या-शुभ्र ओंबी निघत आहेत. सर्व शेतं पांढरीची पांढरी होऊ लागली आहेत.अशाही अवस्थेत शेतकरी कृषी केंद्रांवर किटनाशके खरेदीसाठी रांगा लावून आहेत. पण शेती वाचेल हे सांगायला कुणी तयार नाही. धानाची उगवण झाल्यानंतर कधी नव्हे अशी कीड जी यापूर्वी कधीच पाहिली नाही असे शेतकरी सांगतात. यावर्षी एक, दोन दिवस लोटले की अवकाळी पाऊस हजेरी लावतो. काही ठिकाणी वादळवारा व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी खचला आहे. या अशा वातावरणाच्या परिणामामुळे काकडी, टरबूज, टमाटर वांगी, मिरची, उडीद मूग, हरभरा ही पिकं उध्वस्त झाली आहेत. धान निघायला आता जेमतेम १५-२० दिवसांचा कालावधी उरला आहे. काल-परवापर्यंत हाच धान बघून यंदा चांगले पीक येणार अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच देशावर कोरोनाचे संकट आले.समोर लग्नसराई आहे.शेतात वांगी, काकडी, व वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करून अधिकचे पैसे कमवायचे या आशेपोटी ओलिताची सोय आहे म्हणून भाजीपाला पिकविला. त्याची काही आॅर्डरही नोंदवून झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव व संचारबंदीमुळे सर्व आयोजित विवाहसोहळे रद्द झाले. त्यामुळे घेतलेले आॅर्डरही रद्द झाले. एवढा मोठा शेतमाल विक्र ीला न्यायचा कुठे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला. हा शेतमाल शेतातच पडून सडला तर वांगी पूर्णपणे पिकून गेली. शेवटी ती फेकून द्यावी लागली. भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे तर वेगळेच हाल आहेत. कोरोनामुळे माल बाजारात आणायची भीती आहे.माल आणला तरी तो विकेलच याची शाश्वती नाही. त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळतीलच अशी हमी नाही. वेलवर्गीय पिकाच्या रुपात नगदी पैसा मिळावा हे शेतकºयांचे स्वप्न पार धुळीस मिळाले. हातीबोटी असलेला पैसा लागवड खर्चात गेला. पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती. तीही पूर्णत्वास आली नाही. तोच कोरोनाचा प्रकोप आला. त्याचा सामना करताना आता दमछाक होऊ लागली आहे.शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज द्याभाजीपाला, टरबूज, काकडी पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानही जाण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी शेतकरी खचला नव्हता. पण कोरोना बरोबरच निसर्गही कोपला. धानपिक सोडून नगदी पैशासाठी काही गुंठ्यात भाजीपाला लागवड केली. पाऊस, वादळवारा व गारपिटीने ते उध्वस्त झाले. १५ दिवसात पीक येईल, समृद्धी नांदेल असे वाटत असतानाच हिरवाकंच धान पांढरा शुभ्र होतांना दिसतो. कोरोनाचे संकट पेलवत असताना हे नवीन संकट आता शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.शेतकरी बांधवांनी काय करावं तेच कळत नाही. शेतकºयांना या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे पॅकेज देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती