शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबतच शेतकऱ्यांवर किडीचे मोठे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक कोपामुळे तोंडचा घास हिरावण्याची भीती : बळीराजा चिंतातूर

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की बागायती, शेतात धान असो की भाजीपाला, आज निसर्गाच्या कोपामुळे कुणाचेच चालेना. पोशिंद्यांना चहुबाजूंनी वार सहन करावे लागतात. यावर्षी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. काकडी, टरबूजसारखे वेलवर्गीय पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानालाही किडीने ग्रासले. १५ दिवसात पीक घरात येणार होते ते आता येईल याची शाश्वतीच उरली नाही. बळीराजाचे स्वप्न भंगणार अशीच चिन्ह आहेत.शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे. धानाची पूर्ण उगवण झाल्यानंतर सर्व ओंब्या पांढऱ्या-शुभ्र ओंबी निघत आहेत. सर्व शेतं पांढरीची पांढरी होऊ लागली आहेत.अशाही अवस्थेत शेतकरी कृषी केंद्रांवर किटनाशके खरेदीसाठी रांगा लावून आहेत. पण शेती वाचेल हे सांगायला कुणी तयार नाही. धानाची उगवण झाल्यानंतर कधी नव्हे अशी कीड जी यापूर्वी कधीच पाहिली नाही असे शेतकरी सांगतात. यावर्षी एक, दोन दिवस लोटले की अवकाळी पाऊस हजेरी लावतो. काही ठिकाणी वादळवारा व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी खचला आहे. या अशा वातावरणाच्या परिणामामुळे काकडी, टरबूज, टमाटर वांगी, मिरची, उडीद मूग, हरभरा ही पिकं उध्वस्त झाली आहेत. धान निघायला आता जेमतेम १५-२० दिवसांचा कालावधी उरला आहे. काल-परवापर्यंत हाच धान बघून यंदा चांगले पीक येणार अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच देशावर कोरोनाचे संकट आले.समोर लग्नसराई आहे.शेतात वांगी, काकडी, व वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करून अधिकचे पैसे कमवायचे या आशेपोटी ओलिताची सोय आहे म्हणून भाजीपाला पिकविला. त्याची काही आॅर्डरही नोंदवून झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव व संचारबंदीमुळे सर्व आयोजित विवाहसोहळे रद्द झाले. त्यामुळे घेतलेले आॅर्डरही रद्द झाले. एवढा मोठा शेतमाल विक्र ीला न्यायचा कुठे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला. हा शेतमाल शेतातच पडून सडला तर वांगी पूर्णपणे पिकून गेली. शेवटी ती फेकून द्यावी लागली. भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे तर वेगळेच हाल आहेत. कोरोनामुळे माल बाजारात आणायची भीती आहे.माल आणला तरी तो विकेलच याची शाश्वती नाही. त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळतीलच अशी हमी नाही. वेलवर्गीय पिकाच्या रुपात नगदी पैसा मिळावा हे शेतकºयांचे स्वप्न पार धुळीस मिळाले. हातीबोटी असलेला पैसा लागवड खर्चात गेला. पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती. तीही पूर्णत्वास आली नाही. तोच कोरोनाचा प्रकोप आला. त्याचा सामना करताना आता दमछाक होऊ लागली आहे.शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज द्याभाजीपाला, टरबूज, काकडी पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानही जाण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी शेतकरी खचला नव्हता. पण कोरोना बरोबरच निसर्गही कोपला. धानपिक सोडून नगदी पैशासाठी काही गुंठ्यात भाजीपाला लागवड केली. पाऊस, वादळवारा व गारपिटीने ते उध्वस्त झाले. १५ दिवसात पीक येईल, समृद्धी नांदेल असे वाटत असतानाच हिरवाकंच धान पांढरा शुभ्र होतांना दिसतो. कोरोनाचे संकट पेलवत असताना हे नवीन संकट आता शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.शेतकरी बांधवांनी काय करावं तेच कळत नाही. शेतकºयांना या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे पॅकेज देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती