शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:40 IST

महामार्गामुळे शेतजमिनीचे दर आकाशाला : जिल्ह्यातही येणार समृद्धी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा आता गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महामार्गाच्या विस्ताराने गोंदिया ते मुंबई हे अंतर ८ ते १० तासांत गाठणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे. समृद्धी मार्गामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी येणार आहे.

जिल्ह्यातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. २ लाख १० हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची, तर जवळपास १२ हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. धानावर प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने धानाची विक्री करून मोकळे व्हावे लागते. परिणामी शेतकऱ्यांची फारशी आर्थिक प्रगती झालेली नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकरी ऊस, भाजीपाला, फळबाग लागवडीकडे वळत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे मोठ्या बाजारपेठेत पोहोचविण्याच्या जलद सोयी नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. त्यातून फारसे उत्पन्नही मिळत नाही. शासनाने समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेत त्याच्या कामाला सुरुवात केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आशेचा किरण गवसला आहे. या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना जलद वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, दूध, फळे हे लवकर खराब होणारे घटक आहेत. त्यामुळे त्यांची जेवढ्या जलदगतीने वाहतूक होईल, तेवढे सोयीचे होणार आहे. 

शेतमालाला मिळणार बाजारपेठ समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागपूर, मुंबई, नाशिकसह इतर मोठ्या बाजार- पेठेत शेतमाल पोहोचवून चार पैसे अधिकचे पदरात पाडून घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारा मार्ग ठरणार आहे. सध्या या महामार्गासाठी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

राइस मिल उद्योगाला मिळेल संजीवनी गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कार्गो सेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील राइस मिल उद्योगाला संजीवनी मिळू शकते. शिवाय कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनाही बिरसी विमानतळावरून शेतमाल बाहेर पाठवून अतिरिक्त नफा मिळविण्यास मदत होईल. त्यातच आता समृद्धी महामार्गाचीसुद्धा मदत होणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गgondiya-acगोंदिया