शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

लाखांदुरात पैसेवारी विरोधात शेतकऱ्यांचे धरणे

By admin | Updated: December 22, 2015 01:57 IST

तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५०

लाखांदूर : तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली असल्याने ती रद्द करुन ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहिर करुन लाखांदूर संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीला घेऊन हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.चालू वर्षात पावसाची सरासरी निम्यावर आली. तर रोगामुळे धानपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत आल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात पुरता सापडला. पिक कर्ज, सावकराकडील कर्ज, उसनवार रक्कम घेतल्याने व उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी रडकुंडीवर आला. अशातच प्रशासनाने इंग्रजकालीन १०० वर्ष जुनी आणेवारी व उंबरठा पद्धतीन काढलेली आणेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त येत नसतांना तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून कापणी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन आणेवारी ५० टक्केपेक्षा जास्त नोंदवून शासनाला सादर केली असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केला. खुद्द टेंभुर्णे यांनी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात १२ प्लॉट आणेवारी काढण्यासाठी दिले होते. त्यांची भेट घेवून तपासले असता तलाठ्यानी केलेले पंचनामे व टेंभुर्णेसह शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेले पंचनामे यात मोठी तफावत दिसून आली. एकूणच तलाठ्यांचे पंचनामे बनावट असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाच्या आणेवारीला विरोध केला. यापुर्वी अशाच प्रकारे आणेवारी चूकीची काढल्याने चंद्रशेखर टेंभुर्णे, यांनी आंदोलन केले होते. अखेर प्रशासनाने माघार घेत ३४ गावातील आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी केली होती. त्यामुळे तलाठयांच्या बेजवाबदारपणाच्या निषेधार्थ व लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत व बॅकेतील सोनेतारण कर्ज माफ करावे, या मागण्यांना घेवून शेतकऱ्यांचा उपस्थीतीत धरणे आंदोलन समाजकल्याण सभापती चंद्रशेखर यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती वासूदेव तोंडरे, देवचंद कावळे, भोजराज राऊ त, मनोज ढेंगरी, प्रानेश्वर कावठे, दिगांबर साठवणे, काशीनाथ हत्तीमारे आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)