शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लाखांदुरात पैसेवारी विरोधात शेतकऱ्यांचे धरणे

By admin | Updated: December 22, 2015 01:57 IST

तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५०

लाखांदूर : तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली असल्याने ती रद्द करुन ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहिर करुन लाखांदूर संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीला घेऊन हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.चालू वर्षात पावसाची सरासरी निम्यावर आली. तर रोगामुळे धानपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत आल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात पुरता सापडला. पिक कर्ज, सावकराकडील कर्ज, उसनवार रक्कम घेतल्याने व उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी रडकुंडीवर आला. अशातच प्रशासनाने इंग्रजकालीन १०० वर्ष जुनी आणेवारी व उंबरठा पद्धतीन काढलेली आणेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त येत नसतांना तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून कापणी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन आणेवारी ५० टक्केपेक्षा जास्त नोंदवून शासनाला सादर केली असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केला. खुद्द टेंभुर्णे यांनी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात १२ प्लॉट आणेवारी काढण्यासाठी दिले होते. त्यांची भेट घेवून तपासले असता तलाठ्यानी केलेले पंचनामे व टेंभुर्णेसह शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेले पंचनामे यात मोठी तफावत दिसून आली. एकूणच तलाठ्यांचे पंचनामे बनावट असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाच्या आणेवारीला विरोध केला. यापुर्वी अशाच प्रकारे आणेवारी चूकीची काढल्याने चंद्रशेखर टेंभुर्णे, यांनी आंदोलन केले होते. अखेर प्रशासनाने माघार घेत ३४ गावातील आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी केली होती. त्यामुळे तलाठयांच्या बेजवाबदारपणाच्या निषेधार्थ व लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत व बॅकेतील सोनेतारण कर्ज माफ करावे, या मागण्यांना घेवून शेतकऱ्यांचा उपस्थीतीत धरणे आंदोलन समाजकल्याण सभापती चंद्रशेखर यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती वासूदेव तोंडरे, देवचंद कावळे, भोजराज राऊ त, मनोज ढेंगरी, प्रानेश्वर कावठे, दिगांबर साठवणे, काशीनाथ हत्तीमारे आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)