शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:58 IST

संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती.

ठळक मुद्देबिंदल प्लाझा आगडोंब प्रकरण : पालकमंत्र्यांनी केली होती दोन-दोन लाखांच्या मदतीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. या घटनेला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी सदर घटना घडली होती. यात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता.बिंदल प्लाझामध्ये आगडोंबमधील मृतकांच्या कुटुंबीयांनी शुक्रवार (दि.२४) गोंदिया येथे एकदुसºयांची भेट घेतली. त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. हॉटेल बिंदल प्लाझाचा सध्या जीर्णोद्धार केला जात आहे. त्यांनी प्रशासनाला मागणी करीत सांगितले की, हॉटेल बिंदल प्लाझा आगडोंब प्रकरणाची पुनर्रावृत्ती होवू शकते. यासाठी सदर बांधकाम कार्य त्वरित थांबविण्यात यावे. त्यांनी हॉटेल बिंदल प्लाझाची न्यायीक तपासणी करण्याची मागणी केली.हॉटेल बिंदल प्लाझाच्या तपासणीदरम्यान अनेक अनियमितता आढळल्या. रायपूर येथील तुलसी हॉटेलचे जीर्णोद्धार थांबविण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या वेळी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना बोलावून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.सदर आगडोंब प्रकरणात नागपूर येथील प्रेमकुमार साबू (३५) बिलासपूर येथील हरजित दीक्षित (२४), महू (मध्य प्रदेश) येथील सुरेंद्र सोनी (६३), इंदोर येथील रविंद्र लोहाडे (५४), वरोरा येथील आदित्य कुराडे (३१), सांगली येथील अभिजित पाटील, नागपूर येथील प्रवीण देशकर यांचा मृत्यू झाला होता. प्रेमकुमार यांचे काम, हरजितचे वडील रमेशचंद्र दीक्षित, सुरेंद्र व रविंद्र यांचे बहीणजावई अरूण अजमेरा, आदित्यचे वडील प्रा. अशोक कुराडे यांनी एका पत्रपरिषदेत सदर प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली.त्यांनी सांगितले की, न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान हॉटेलच्या मालकाला ते मिळाले. मात्र त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केली नाही. त्यांनी वेगळ्या स्वरूपात नुकसानभरपाईसाठी राज्य ग्राहक न्यायालयातसुद्धा प्रकरण दाखल केल्याची माहिती दिली. हॉटेलच्या जीर्णोद्धाराचे काम बंद करण्यात न आल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असेसुद्धा मृतकांच्या कुटुंबीयांनी सांगितले.- कुठून आले एवढे सिलेंडर?पोलिसांच्या अहवालात २२ सिलेंडर मिळाल्याचे नोंद आहे. एवढे मोठे सिलेंडर कुठून आले? जेव्हा रेस्टारेंट बंद होते तर त्या सिलेंडरची गरज का पडत होती? हॉटेलच्या खाली जी महासेल नामक कपड्याची दुकान होती. संपूर्ण पायºयांवर त्यांचा ताबा होता. परंतु आतापर्यंत जी महासेलच्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.फटाका दुकानांना अभयअरूण अजमेरा यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यापासून काही अंतरावरच फटाक्यांनी अनेक दुकाने आहेत. एवढ्या दाट लोकवस्तीत ही दुकाने असावी किंवा नाही? परिसरातील नागरिकांसह अनेकदा बैठक झाली. समझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकाºयांकडे तक्रारही करण्यात आली. परंतु प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच तेथील दुकानेसुद्धा हटविण्यात आल्या नाही. एखाद्या मोठ्या घटनेची वाट तर प्रशासन पाहात नाही? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.