शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नुकसानभरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:58 IST

संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती.

ठळक मुद्देबिंदल प्लाझा आगडोंब प्रकरण : पालकमंत्र्यांनी केली होती दोन-दोन लाखांच्या मदतीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. या घटनेला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी सदर घटना घडली होती. यात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता.बिंदल प्लाझामध्ये आगडोंबमधील मृतकांच्या कुटुंबीयांनी शुक्रवार (दि.२४) गोंदिया येथे एकदुसºयांची भेट घेतली. त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. हॉटेल बिंदल प्लाझाचा सध्या जीर्णोद्धार केला जात आहे. त्यांनी प्रशासनाला मागणी करीत सांगितले की, हॉटेल बिंदल प्लाझा आगडोंब प्रकरणाची पुनर्रावृत्ती होवू शकते. यासाठी सदर बांधकाम कार्य त्वरित थांबविण्यात यावे. त्यांनी हॉटेल बिंदल प्लाझाची न्यायीक तपासणी करण्याची मागणी केली.हॉटेल बिंदल प्लाझाच्या तपासणीदरम्यान अनेक अनियमितता आढळल्या. रायपूर येथील तुलसी हॉटेलचे जीर्णोद्धार थांबविण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या वेळी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना बोलावून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.सदर आगडोंब प्रकरणात नागपूर येथील प्रेमकुमार साबू (३५) बिलासपूर येथील हरजित दीक्षित (२४), महू (मध्य प्रदेश) येथील सुरेंद्र सोनी (६३), इंदोर येथील रविंद्र लोहाडे (५४), वरोरा येथील आदित्य कुराडे (३१), सांगली येथील अभिजित पाटील, नागपूर येथील प्रवीण देशकर यांचा मृत्यू झाला होता. प्रेमकुमार यांचे काम, हरजितचे वडील रमेशचंद्र दीक्षित, सुरेंद्र व रविंद्र यांचे बहीणजावई अरूण अजमेरा, आदित्यचे वडील प्रा. अशोक कुराडे यांनी एका पत्रपरिषदेत सदर प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली.त्यांनी सांगितले की, न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान हॉटेलच्या मालकाला ते मिळाले. मात्र त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केली नाही. त्यांनी वेगळ्या स्वरूपात नुकसानभरपाईसाठी राज्य ग्राहक न्यायालयातसुद्धा प्रकरण दाखल केल्याची माहिती दिली. हॉटेलच्या जीर्णोद्धाराचे काम बंद करण्यात न आल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असेसुद्धा मृतकांच्या कुटुंबीयांनी सांगितले.- कुठून आले एवढे सिलेंडर?पोलिसांच्या अहवालात २२ सिलेंडर मिळाल्याचे नोंद आहे. एवढे मोठे सिलेंडर कुठून आले? जेव्हा रेस्टारेंट बंद होते तर त्या सिलेंडरची गरज का पडत होती? हॉटेलच्या खाली जी महासेल नामक कपड्याची दुकान होती. संपूर्ण पायºयांवर त्यांचा ताबा होता. परंतु आतापर्यंत जी महासेलच्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.फटाका दुकानांना अभयअरूण अजमेरा यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यापासून काही अंतरावरच फटाक्यांनी अनेक दुकाने आहेत. एवढ्या दाट लोकवस्तीत ही दुकाने असावी किंवा नाही? परिसरातील नागरिकांसह अनेकदा बैठक झाली. समझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकाºयांकडे तक्रारही करण्यात आली. परंतु प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच तेथील दुकानेसुद्धा हटविण्यात आल्या नाही. एखाद्या मोठ्या घटनेची वाट तर प्रशासन पाहात नाही? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.