शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

१० गावांतील धान पिकावर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:21 IST

यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देआर्थिक नुकसानीचा धोका : कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यातील १० गावांत धान पिकावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागान दिला आहे. अस्मानी व सुल्तानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी पावसाने साथ दिली नाही. यंदा पावसाने साथ दिली तर किडरोगांनी डोकेदुखी वाढविली आहे. परिणामी शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धान पिकांवर किडरोगाचा प्रभाव असून तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.यात, तालुक्यातील रजेगाव, शिवनी, उमरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील घटेगाव, खोडशिवनी, हेटी (गिरोला), पुरकाबोडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर, प्रतापगड व देवरी तालुक्यातील पिंडकेपार या गावांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीतील सर्वेक्षण करण्यात आले. त्या अहवालात रजेगाव येथे ०.६० टक्के, शिवनी येथे ०.८० टक्के, उमरी येथे ३.०७ टक्के, खोडकिड्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. तर घटेगाव येथे २.२० टक्के धान पिकावर कडा-करपाचा प्रभाव १७ तारखेपर्यंत होता.हेटी (गिरोला) येथे १.३ टक्के, घटेगाव येथे १.१५ टक्के, पुरकाबोडी येथे १.०५ टक्के, इसापूर येथे १.६५ टक्के, प्रतापगड येथे १.४८ टक्के पिकार कडा-करपाचा प्रभाव दिसला आहे. घटेगाव येथे १.५५ टक्के, खोडशिवनी येथे १.०२ टक्के, हेटी येथे १ टक्के, इसापूर येथे १.३ टक्के व पिंडकेपार येथे १.३३ टक्के मानमोडी किडींचा प्रकोप होता. तुडतुडाचा प्रकोप वाढण्याची शक्यता सध्या पाऊस थांबला असून चांगलेच उन्ह तापत आहे. अशा या वातावरणात धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी विभागाने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात तुडतुडा नियंत्रण मोहिम चालविली होती. यामुळे याचा प्रभाव जिल्ह्यात कमी दिसला व त्यामुळेच नुकसानही कमी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.आता खोडकिडा गादमाशी, कडा-करपाचा धान पिकावर प्रभाव होण्याची शक्यता नाही. त्यांच्या प्रकोपाची वेळ आता निघून गेली आहे. मात्र वातावरण बघता तुडतुड्याचा प्रभाव दिसू शकतो. यामुळे सतर्क राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.-एन.वी.नयनवाडेप्रभारी सहायक, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस