शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१० गावांतील धान पिकावर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:21 IST

यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देआर्थिक नुकसानीचा धोका : कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यातील १० गावांत धान पिकावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागान दिला आहे. अस्मानी व सुल्तानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी पावसाने साथ दिली नाही. यंदा पावसाने साथ दिली तर किडरोगांनी डोकेदुखी वाढविली आहे. परिणामी शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धान पिकांवर किडरोगाचा प्रभाव असून तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.यात, तालुक्यातील रजेगाव, शिवनी, उमरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील घटेगाव, खोडशिवनी, हेटी (गिरोला), पुरकाबोडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर, प्रतापगड व देवरी तालुक्यातील पिंडकेपार या गावांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीतील सर्वेक्षण करण्यात आले. त्या अहवालात रजेगाव येथे ०.६० टक्के, शिवनी येथे ०.८० टक्के, उमरी येथे ३.०७ टक्के, खोडकिड्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. तर घटेगाव येथे २.२० टक्के धान पिकावर कडा-करपाचा प्रभाव १७ तारखेपर्यंत होता.हेटी (गिरोला) येथे १.३ टक्के, घटेगाव येथे १.१५ टक्के, पुरकाबोडी येथे १.०५ टक्के, इसापूर येथे १.६५ टक्के, प्रतापगड येथे १.४८ टक्के पिकार कडा-करपाचा प्रभाव दिसला आहे. घटेगाव येथे १.५५ टक्के, खोडशिवनी येथे १.०२ टक्के, हेटी येथे १ टक्के, इसापूर येथे १.३ टक्के व पिंडकेपार येथे १.३३ टक्के मानमोडी किडींचा प्रकोप होता. तुडतुडाचा प्रकोप वाढण्याची शक्यता सध्या पाऊस थांबला असून चांगलेच उन्ह तापत आहे. अशा या वातावरणात धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी विभागाने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात तुडतुडा नियंत्रण मोहिम चालविली होती. यामुळे याचा प्रभाव जिल्ह्यात कमी दिसला व त्यामुळेच नुकसानही कमी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.आता खोडकिडा गादमाशी, कडा-करपाचा धान पिकावर प्रभाव होण्याची शक्यता नाही. त्यांच्या प्रकोपाची वेळ आता निघून गेली आहे. मात्र वातावरण बघता तुडतुड्याचा प्रभाव दिसू शकतो. यामुळे सतर्क राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.-एन.वी.नयनवाडेप्रभारी सहायक, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस