शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ९९ हजार हेक्टर होणार खरिपाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून सरासरी १३२७ मीमी.पाऊस पडतो. एवढा पाऊस हा धानपिकांसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. तर ६ हजार ४४ हेक्टरवर तूर, १२०४ हेक्टर तीळ, १८२८ हेक्टर भाजीपाला, ८७० हेक्टर ऊस अशा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा खरीपात लागवड केली जाणार आहे.

ठळक मुद्देखते, बियाणांचे नियोजन पूर्ण : बळीराजा गुंतला शेतीच्या कामात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृगाचा पाऊस पडताच शेतकरी खरीपाच्या कामाला लागतात. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात येणार असून पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यात बळीराजा सध्या व्यस्त असल्याचे चित्र आहे. सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी वेळीच पाऊस झाल्यास पेरणी करता यावी यादृष्टीने नियोजन केले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून सरासरी १३२७ मीमी.पाऊस पडतो. एवढा पाऊस हा धानपिकांसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. तर ६ हजार ४४ हेक्टरवर तूर, १२०४ हेक्टर तीळ, १८२८ हेक्टर भाजीपाला, ८७० हेक्टर ऊस अशा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा खरीपात लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी मृग नक्षत्राचा दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. रविवारपासून (दि.७) मृग नक्षत्राला सुरूवात झाली. जिल्ह्यातील काही मृगाच्या पावसाने दमदार हजेरी सुध्दा लावली. मात्र अद्यापही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी होती. त्यामुळे याचा शेतीच्या कामावर सुध्दा परिणाम झाला होता.खरीप हंगामपूर्व शेतीची कामे लांबली होती. मात्र आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून शेतकरी सुध्दा नवीन जोमाने कामाला लागला आहे. पेरणी योग्य पाऊस होताच वेळेत पेरणी करता यावी यासाठी बळीराजा खते, बियाणांची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.खते बियाणांचा पुरेसा साठाखरीप हंगामा दरम्यान जिल्ह्यात खते, बियाणांचा तुडवडा निर्माण होवू नये यासाठी कृषी विभागाने यंदा त्यादृष्टीने नियोजन केले आहे. मागील वर्षी कृषी विभागाने ४५ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. तर यंदा कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन विचारात घेवून ६८ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. यापैकी ६३ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध देखील झाले आहेत. तर संपूर्ण खरीपासाठी एकूण ८३ हजार मेट्रीक टन विविध खतांची मागणी केली असून त्यापैकी २३ हजार मेट्रीक टन खते उपलब्ध असून खरीपात खताची टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.२३८ बियाणांचे घेतले नमुनेखरीप हंगामादरम्यान खते आणि बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाकडून बियाणांचे नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. कृषी विभागाने कृषी केंद्राकडून एकूण २३८ बियाणांचे नमुने घेतले होते. त्यापैकी दोन बियाणांचे नमुने फेल झाल्याने कृषी विभागाने सदर बियाणे विक्री बंदचे आदेश दिले आहे. तसेच २७४० किलो बियाणे विक्रीस मनाई केली आहे.चार कृषी केंद्रावर कारवाईखते आणि बियाणे विक्रेत्यांनी नियमांचे उल्लघंन केल्याने कृषी विभागाने जिल्ह्यातील दोन कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलबिंत केले आहे तर दोन कृषी केंद्रावर विक्री बंदची कारवाई करण्यात आली आहे.९ भरारी पथकाची असणार नजरखरीप हंगामादरम्यान कृषी केंद्र संचालकाकडून नियमांचे उल्लंघन केले जावू नये, खते, बियाणांचा काळाबाजार होवू नये यासाठी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर ९ भरारी पथके गठीत करण्यात आले. या भरारी पथकांची नजर यासर्वांवर असणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी