शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हीच काय महामार्गाच्या कामाची गुणवत्ता ? सहा महिन्यांतच गोंदिया-बालाघाट रस्ता खचला

By अंकुश गुंडावार | Updated: July 21, 2025 19:39 IST

दखल घेण्याऐवजी डोळेझाक : बांधकामाचा निधी मुरतोय कुठे

गोंदिया : कुठले राज्य, जिल्ह्यातील रस्ते हे त्या भागाच्या विकासाचा आरसा असतात. त्यामुळे रस्त्यांच्या जाळ्यांना रक्तवाहिन्या म्हटले जाते. त्यातही राष्ट्रीय महामार्ग म्हटले की, त्यांच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी थोडी हिम्मतच लागते. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीच तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण त्यांचा हा दावा कितपत खरा याबाबत थोडी शंका आहे. सहा महिन्यांपूर्वीच तयार केलेल्या नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाटाजवळील रस्ता पहिल्याच पावसात खचला. गोंदिया-बालाघाट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ ची स्लोपिंग लोकार्पणापूर्वीच खचली. ही केवळ दोनच उदाहरणे नाहीत तर अशी अनेक रस्त्यांची अवस्था आहे. या रस्त्यांचे अल्पावधीत पितळ उघडे पडल्याने हीच काय राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गुणवत्ता? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या सोशल मीडियावर गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाची स्लोपिंग खचल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून, जानेवारी २०२६ मध्ये त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. या रस्त्याच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. पण पहिल्याच मुसळधार पावसाने या राष्ट्रीय महामार्गालगतची स्लोपिंग पूर्णपणे खचली. स्लोपिंग तयार करताना त्यात मुरुमाऐवजी विद्युत केंद्रामधील राखेचा अधिक वापर केल्याचे बोलले जाते. स्लोपिंग तयार करताना त्याखाली भिंत तयार करणे गरजचे होते. पण तसे न केल्याने पावसामुळे ही स्लोपिंग खचली. तर काही ठिकाणच्या अंडरपास पुलाला तडे गेले आहेत. याच राष्ट्रीय महामार्गालगत संबंधित बांधकाम कंपनीने तयार केलेले गोंगलई येथील बसस्थानक केव्हाही खचण्याची भीती आहे. 

या ४१.२१ किमीच्या बांधकामावर ५४७ कोटी खर्च केले जाणार आहेत. पण लोकार्पणापूर्वीच स्लोपिंग खचल्याने ती दुरुस्त करण्याचा भुर्दंड संबंधित बांधकाम करणाऱ्या हरयाणा येथील कंपनीला बसला. शिवाय कंपनीवर यामुळे दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. ही बांधकाम कंपनी केंद्रातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाची असल्याची माहिती आहे. त्यामुळे कदाचित या प्रकाराची तेवढ्या गांभीर्याने दखल घेतली जाणार नाही. नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाटाजवळ पूल व रस्ता तयार करण्याचे काम अग्रवाल ग्लोबल या बांधकाम कंपनीने केले. या कंपनीने तयार केलेला रस्ता व पुलाचे बांधकाम नेहमीच वादग्रस्त राहिले. गोंदिया जिल्ह्यात पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसाने मासुलकसा घाटाजवळील रस्ता खचला तर यापूर्वी देखील पुलाची साईडिंग खचली होती. या राष्ट्रीय महामार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. अशात या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता जर एवढी सुमार असेल आणि बांधकामानंतर सहा महिन्यांतच जर रस्ता खचत असेल तर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कितपत सुरक्षित असणार, याचा विचार न केलेलाच बरा. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत केले जाणारे दावे कितपत खरे हे विचार करण्यास भाग पाडते.

दखल घेण्याऐवजी डोळेझाककोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यावरून ये-जा करणे कठीण झाले. तर काही मार्गावर बसफेरी बंद करण्यात आली. पण याचे संबंधित विभागाला काहीच घेणे-देणे नाही. याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष कसे करता येईल, याची काळजी घेतली जात आहे. 

जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांचे हालगोंदिया जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांचे सुद्धा पहिल्याच पावसाने पितळ उघडे पाडले आहे. गोंदिया तालुक्यातील इरीं येथे तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता दुसऱ्याच दिवशी उखडला. तर तिरोडा, गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्यांत असे अनेक रस्ते आहेत. या रस्ता बांधकामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण कामाची गुणवत्ता फारच सुमार असल्याने हा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे मुरतोय? असा प्रश्न आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकgondiya-acगोंदिया