शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

जिल्हा परिषदमध्ये निघतात प्रतिनियुक्तीचे नियमबाह्य आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली.

ठळक मुद्देहात ओले झाल्याची चर्चा : पदोन्नती होताच प्रतिनियुक्तीवर बोलाविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आयएसओचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे ढिसाळ झाला आहे. मिनी मंत्रालयात काम करणारे अधिकारी आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती व सोयीनुसार प्रतिनियुक्ती देत असल्याचे प्रकार उघडकी येत आहे. वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात आली. परंतु लगेच त्याला पुन्हा प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली. तरीही त्या कर्मचाऱ्यावर माध्यमिक शिक्षण विभागाची नजर जात नाही. माध्यमिक शिक्षण विभागाचा मोह न सोडणाºया या कर्मचाऱ्याची पदोन्नती आमगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून झाली.मात्र तेथे एकही दिवस नोकरी न करता राजकीय दबाव आणून आणि शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत अनुकंपा तत्वावर लागलेला एक कर्मचारी माध्यमिक विभागातील एका विशिष्ट टेबलाशिवाय दुसºया कुठल्याच कार्यालयात जिथे बदली झाली तिथे काम केल्याचे दिसून येत नाही. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कसे मेहरबान आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातही कार्यालयातून कार्यमुक्त न होता सरळ रूजू झालेल्या त्या कर्मचाºयाला आमगावचे खंडविकास अधिकाºयांची मुकसंमती आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर असताना काय केले हे त्या विभागातील सर्वांनाच नव्हे तर खासगी माध्यमिक शाळांमधील सर्वच मुख्याध्यापक व शिक्षकांना ठाऊक आहे. जिल्हा परिषदेच्या सन २०१९ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्या कर्मचाºयाची देवरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात बदली झाली. मात्र तो तिथेही थांबला नाही. त्याने तिथून प्रतिनियुक्तीसाठी राजकीय व प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर करु न घेतला. २८ मे २०१९ रोजी बदली झालेला व्यक्ती देवरीला ६ जून रोजी रूजू होते.या काळात खूप आटापिटा केला आणि आपली बदली रद्द व्हावी म्हणून कसरत केली. परंतु यश न आल्याने शेवटी ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत परत आणण्यात आले.दरम्यानच्या काळात हा कर्मचारी कधीही देवरीतील कार्यालयात वेळेवर पोचला नाही. अशा कर्मचाऱ्याला आता पदोन्नती मिळाली. पदोन्नतीमध्ये आमगाव पंचायत समिती मिळाली असली तरी आपली प्रतिनियुक्ती गोंदियात करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक