शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

कामठा-पांजरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 9:37 PM

तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देवर्षभरात तिघांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नसल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.कामठा-आमगाव मार्गे भोषा ते पांजरा हा रस्ता खड्डयांमुळे गायब झाल्याचे चित्र आहे. डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या गावकºयांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. भोसा, किकरीपार, कट्टीपार, बनगाव, गणेश घाट या रस्त्यांची सुध्दा तिच स्थिती आहे. वर्षाभरात या ठिकाणी तीन अपघात झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच मार्गावरुन बालाघाट ते डोंगरगड, राजनांदगाव, रायपूर, भिलाई येथील प्रवासी प्रवास करतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेकडो दुचाकी, चारचाकी व जडवाहन या रस्त्यावरुन धावतात. मागील वर्षभरापासून अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी याची दखल घेवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी भोसा येथील सरपंच सुनील ब्राम्हणकर, सहकार चळवळीचे नेते सुखदेव ब्राम्हणकर, कालीमाटीचे सरपंच गजानन भूते, करंजीचे सरपंच डॉ. हंसराज चुटे, काँग्रेसचे नेते गणेश हुकरे, गणेश हर्षे, शंकर रहांगडाले, युवराज पटले, महेंद्र रहांगडाले, बंडू सोनवाने, अशोक खोब्रागडे, लोकचंद तरोणे, हुलसराम बहेकार, शंकर कुरंजेकर, योगेश्वर फरकुंडे, एकनाथ हत्तीमारे, सरिता बहेकार, संगिता फुंडे, मनिषा मटाले, कांता मटाले, वच्छला बागडे, देवानंद डोंगरे, योगेश चुटे, धनिराम मरस्कोल्हे, हेमंत तावाडे, पारबता भांडारकर, पारबता हेमणे, ललीता लांजेवार, केशर फुंडे यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारकामठा ते आमगाव या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. गावकऱ्यांनी याबाबत ची तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पत्र देऊन मोकळे होण्यातच धन्यता मानली. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम आहे.