शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्ग देताहेत अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने

रावणवाडी : गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने करुन मोठ्या प्रमाणात निधीचा उपहार केला जातो. असाच प्रकार गोंदिया- बालाघाट राज्य मार्गावर दिसून येत आहे. या राज्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून ते खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. मात्र संबंधित विभाग कायमस्वरुपी उपाययोजना करीत नसल्याचे चित्र या भागात दिसून येते.गोंदिया ते बालाघाट हा मार्ग आंतरराज्यीय मार्ग असून तालुक्यातील सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणून जिल्ह्यात या मार्गाची ओळख आहे. दोन मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने तसेच या मार्गवरुन बिरसी हवाई पट्टीला जोडले असल्यानेही या मार्गावर अनेक लहान मोठ्या वाहनांची येथे सततची वर्दळ असते. रावणवाडी येथील माजी प्राध्यापक ठाकरे यांच्या घरासमोर मागील बऱ्याच काळापासून भयावह खड्डे पडले आहेत. त्यामुळे आल्या दिवशी येथे लहान मोठे अपघात घडण्याचा नित्यक्रमच सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील चार महिन्यांपुर्वी येथे डांबर गिट्टीचा लेप चढवून हजारो रुपये कंत्राटदाराला मोजले. मात्र आल्पशा काळातच तो खड्डा पुर्वी प्रमाणेच झाला असून पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता सार्वजनिक बांधकाम विभाग मार्गावरील खड्डे पुन्हा बुजविण्याच्या कामाला लागला आहे.सध्या त्याच खड्यांची डागडूजी करण्यात येत असल्यामुळे हे दृष्य पाहून येथील नागरिक अंंचभीत झाले आहेत. या राज्य मार्गाला बरीचशी उपमार्गे जोडली आहेत. या मार्गाच्या कडेला बहुतांश विद्यालये व महाविद्यालये असल्यामुळे अनेक विद्यार्थी सायकलने ये-जा करीत असतात. यामुळे त्यांनाही या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच करणे भाग पडत असते तर कधी अपघातही होत असतात. अशा परिस्थितीत संबंधित विभाग मार्गावर मुरुमाचा लेप लाऊन प्रवाशांना कोणता संदेश देत आहेत. हा प्रकार गुंतागुंताची ठरला आहे. या ठिकाणी खड्डे पडले असल्याने मार्गावरील गिट्टी उखडून रस्ताच्या कडेला पसरली आहे. तर या खड्यांत पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याची नेमकी स्थिती उगमत नाही व त्यातूनही अपघात घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्गाची झालेली डागडूजी अल्पावधितच उखडून पुन्हा त्याच ठिकाणी खड्यांची निर्मिती आली असल्यामुळे या प्रकाराची सर्वोपरी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.