शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

राज्य मार्ग देताहेत अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने

रावणवाडी : गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने करुन मोठ्या प्रमाणात निधीचा उपहार केला जातो. असाच प्रकार गोंदिया- बालाघाट राज्य मार्गावर दिसून येत आहे. या राज्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून ते खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. मात्र संबंधित विभाग कायमस्वरुपी उपाययोजना करीत नसल्याचे चित्र या भागात दिसून येते.गोंदिया ते बालाघाट हा मार्ग आंतरराज्यीय मार्ग असून तालुक्यातील सर्वात वर्दळीचा मार्ग म्हणून जिल्ह्यात या मार्गाची ओळख आहे. दोन मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने तसेच या मार्गवरुन बिरसी हवाई पट्टीला जोडले असल्यानेही या मार्गावर अनेक लहान मोठ्या वाहनांची येथे सततची वर्दळ असते. रावणवाडी येथील माजी प्राध्यापक ठाकरे यांच्या घरासमोर मागील बऱ्याच काळापासून भयावह खड्डे पडले आहेत. त्यामुळे आल्या दिवशी येथे लहान मोठे अपघात घडण्याचा नित्यक्रमच सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील चार महिन्यांपुर्वी येथे डांबर गिट्टीचा लेप चढवून हजारो रुपये कंत्राटदाराला मोजले. मात्र आल्पशा काळातच तो खड्डा पुर्वी प्रमाणेच झाला असून पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता सार्वजनिक बांधकाम विभाग मार्गावरील खड्डे पुन्हा बुजविण्याच्या कामाला लागला आहे.सध्या त्याच खड्यांची डागडूजी करण्यात येत असल्यामुळे हे दृष्य पाहून येथील नागरिक अंंचभीत झाले आहेत. या राज्य मार्गाला बरीचशी उपमार्गे जोडली आहेत. या मार्गाच्या कडेला बहुतांश विद्यालये व महाविद्यालये असल्यामुळे अनेक विद्यार्थी सायकलने ये-जा करीत असतात. यामुळे त्यांनाही या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच करणे भाग पडत असते तर कधी अपघातही होत असतात. अशा परिस्थितीत संबंधित विभाग मार्गावर मुरुमाचा लेप लाऊन प्रवाशांना कोणता संदेश देत आहेत. हा प्रकार गुंतागुंताची ठरला आहे. या ठिकाणी खड्डे पडले असल्याने मार्गावरील गिट्टी उखडून रस्ताच्या कडेला पसरली आहे. तर या खड्यांत पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याची नेमकी स्थिती उगमत नाही व त्यातूनही अपघात घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्गाची झालेली डागडूजी अल्पावधितच उखडून पुन्हा त्याच ठिकाणी खड्यांची निर्मिती आली असल्यामुळे या प्रकाराची सर्वोपरी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.