शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाने विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तांचा ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाने विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तांचा जीव गेला. त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. कोरोनानंतर येणारा फेज आत्महत्यांचा राहणार आहे. कोरोनामुळे नोकरी गेली, आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे जगायचे कसे? हा महत्त्वाचा प्रश्न लाखो लोकांना भेडसावत आहे. आम्ही जगायचे कसे? याच विवंचनेत लोक गुरफटून आहेत.

जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा आकडा युद्धात जीव गमावलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी कुटुंबे आप्तांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपल्या उदरनिर्वाहाचे साधन कोरोनामुळे गमवावे लागले आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. यातून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले असून, त्यातून आत्महत्या थांबविल्या जाणार असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ तथा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. लोकेश चिरवतकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

.....................

कोण म्हणतो, पुरुष व्यक्त होत नाही?

कोरोनाच्या महामारीनंतर दुसरी लाट आत्महत्येची येणार आहे. यासंदर्भात जगभर चर्चा व्हावी आणि आत्महत्या थांबविता याव्यात, यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२० च्या ‘द हिंदू’च्या सर्व्हेनुसार, एका तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. भारतात वर्षाकाठी २५ हजार विद्यार्थी आत्महत्या करतात. भारतीय सांख्यिकी विभागानुसार १५ ते २९ या वयोगटातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आत्महत्या हे आहे. आपल्या मनातील दु:ख पुरुषही व्यक्त करायला लागले आहेत.

.......................

पुरुष सर्वाधिक तणावात असतात

पुरुषांच्या आत्महत्येची कारणे आर्थिक आणि सामाजिक असतात. महिलांची कारणे भावनिक असतात. पुरुषांच्या आत्महत्येमुळे मरणाचे प्रमाण महिलांच्या तुलनेत दुप्पट आहे. विविध कारणांमुळे असह्य मानसिक वेदना झाल्यामुळे सुटकेची तीव्र इच्छा तयार होते आणि त्यातून आत्महत्या करतात.

.........

तरुणांचे प्रश्न वेगळेच

१) तरुण वयातच कोरोनामुळे जॉबलेस झालेल्या तरुणांच्या अंगी नैराश्य येत आहे. त्या नैराश्येमुळे पुढचे आयुष्य कसे जगणार, याचा आटापिटा करीत असलेली तरुण मंडळी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत.

२) तरुणांमध्ये व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वांत मोठे आत्महत्येसाठी कारण आहे. दारूमुळे व्यक्तींची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. मेंदूत बदल होतात. त्यामुळे हे आत्महत्या करतात. दारूमुळे तरुण डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करतात.

३) शारीरीक, मानसिक आणि सामाजिक तणाव, दुर्धर आजारांमुळे खचून जाऊन आत्महत्या केल्या जातात. तणाव व कौटुंबिक कलह हे सर्वात मोठे आत्महत्येचे कारण आहे. डिप्रेशन, सिजोप्रेमीया (संशयाचा आजार), मेनिया (कभी खुशी, कभी गम) या मानसिक आजारांमुळेही आत्महत्या होत असतात.

.............................

१०४ हेल्पलाईनवरून करा समस्यांचे समाधान

व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वात मोठे आत्महत्येसाठी कारण आहे.

यासंदर्भात आत्महत्येची पाळी कुणावरही येऊ नये, यासाठी कुटुंबियांनी व मित्रमंडळींनी यासाठी तत्पर असायला हवे. सरकार, प्रसारमाध्यम व जनता या तिघांनी मिळून आत्महत्या प्रतिबंध करण्याची गरज आहे. सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले. त्यात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता आदी चमू यात निदान आणि उपचार मोफत दिले जात आहेत. कुणाला गरज पडल्यास १०४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून सामान्य जनता आपल्या समस्येसंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकतात.

.................

कोट

१८ वर्षांखालील जे आत्महत्या करतात, ते शिक्षणासंदर्भात वाढती स्पर्धा, अभ्यासाचा तणाव, त्यांची कमकुवत सहनशिलता, पब्जी व सोशल मीडियाचे जडलेले व्यसन यातून अल्पवयीन विद्यार्थी आत्महत्या करतात. प्रत्येकाला औषधाची गरज नसते. फक्त समुपदेशन (कौन्सिलिंगच्या) माध्यमातून त्याच्या तणावाचे निवारण केले जाऊ शकते. एखादा व्यक्ती बोलत नाही, तर त्याच्या हावभावावरून किंवा हालचालींवरून आपल्याला सहज समजते. आणि तो तणावात आहे, त्याची विचारपूस करणे आवश्यक आहे. - डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

.........................

गेल्या वर्षभरात हेल्पलाईनवर आलेले कॉल - २२०००

महिला - ४०००

पुरुष - १८०००