शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. ओबीसी जागा सर्वसाधारण करून या जागांसाठी ५० महिला आरक्षणाकरिता गुरुवारी (दि.२३) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी उमेदवारी देण्याचा पेच पक्षासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पक्ष कोणता रामबाण इलाज शोधते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली, तर २९ जानेवारीपासून या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र, आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

उमेदवारीकडे लक्ष - ३० जागांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित केले होते; पण आरक्षणामुळे त्यात थोडाफार बदल झाला असून, कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे.

जागा सर्वसाधारण, पण उमेदवार ओबीसीच - स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले असले तरी या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला होता. त्याच निर्णयानुसार या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी दिली जात आहे. मात्र, यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे अनेकांची नाराजी पक्षाला सहन करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी २९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ४ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदreservationआरक्षण