शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. ओबीसी जागा सर्वसाधारण करून या जागांसाठी ५० महिला आरक्षणाकरिता गुरुवारी (दि.२३) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी उमेदवारी देण्याचा पेच पक्षासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पक्ष कोणता रामबाण इलाज शोधते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली, तर २९ जानेवारीपासून या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र, आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

उमेदवारीकडे लक्ष - ३० जागांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित केले होते; पण आरक्षणामुळे त्यात थोडाफार बदल झाला असून, कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे.

जागा सर्वसाधारण, पण उमेदवार ओबीसीच - स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले असले तरी या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला होता. त्याच निर्णयानुसार या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी दिली जात आहे. मात्र, यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे अनेकांची नाराजी पक्षाला सहन करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी २९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ४ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदreservationआरक्षण