शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. ओबीसी जागा सर्वसाधारण करून या जागांसाठी ५० महिला आरक्षणाकरिता गुरुवारी (दि.२३) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी उमेदवारी देण्याचा पेच पक्षासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पक्ष कोणता रामबाण इलाज शोधते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली, तर २९ जानेवारीपासून या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र, आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे. 

उमेदवारीकडे लक्ष - ३० जागांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित केले होते; पण आरक्षणामुळे त्यात थोडाफार बदल झाला असून, कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे.

जागा सर्वसाधारण, पण उमेदवार ओबीसीच - स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले असले तरी या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला होता. त्याच निर्णयानुसार या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी दिली जात आहे. मात्र, यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे अनेकांची नाराजी पक्षाला सहन करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी २९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ४ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदreservationआरक्षण