शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

कापूर, निलगिरी तेलाच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:30 IST

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे.

ठळक मुद्दे नागरिकांनी घेतली स्वाईन फ्लूची धास्ती : उपाययोजनांचा अभाव

हितेश रहांगडाले।लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे. आरोग्य प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता नागरिकांनीच स्वाईन फ्ल्यूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कापूर व निलगिरी तेलाचा वापर सुरू केला आहे.आठ दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील तीन जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जनता सावध झाली आहे. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्या जाणाºया निलगिरी तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.याबाबद निलगिरी तेलच्या होलसेल विक्रेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी तेलाची महिन्याला साधारणत: १५ हजार बॉटल्सची मागणी असायची. आता ही मागणी तिपटीने वाढून ४५ हजार बॉटल्सवर पोहचली आहे. एवढेच नव्हे तर साधारणत: १६ रुपये किंमतीला येणारी पाच मिली निलगिरी तेलाची किंमत वाढून २५ रुपये करण्यात आली. शिवाय छोट्या बॉटलची मागणी वाढल्यामुळे औषधी दुकानात त्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यांना ५० ते १०० रुपये किमंतीचा निलगिरी तेल खरेदी करावे लागत आहे.स्वाईन फ्लू प्रतिबंधक समजल्या जाणाºया कापूरच्या मागणीत वाढ झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचारी, कामावरील मजूरवर्गही सोबत कापूर बाळगत आहेत. परिणामी ५०० रुपये किलोने मिळणाºया कापराची किंमत ७०० रुपयांपेक्षा अधिक झाल्याची माहिती आहे.कापराची मागणी वाढण्यास नवरात्रोत्सव हे एक कारण असले तरी स्वाईन फ्लूच्या भीतीनेही कापूर विक्रीत वाढ झाली आहे. सोबत विलायचीसुद्धा नेली जात आहे.‘तो’ रुग्ण स्वाईन फ्लूचा नाहीतिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील नयन नंदकिशोर राघोर्ते (२) हा रुग्ण संशयीत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. परंतु डॉक्टरांनी सर्व तपासण्या करुन सदर रुग्ण स्वाईन फ्लूचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो सध्या स्वस्थ असून रुग्णालयातून त्याला सुट्टी देण्यात आली आहे.आरोग्य प्रशासनाची बघ्याची भूमिकाजिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार वाढत असताना अद्यापही व्यापक स्वरुपात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरूवात केलेली नाही. लोकांमध्ये जनजागृती करण्याकडेसुध्दा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.आवाहन करुन झटकले हातस्वाईन फ्ल्यूचा प्रसार नेमका कशामुळे होते. तो होवू नये यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासंबंधीचे चार ओळींचे पत्रक काढून आरोग्य विभागाने हात झटकले आहे. अद्यापही ग्रामीण भागात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप सुरू केले नसून आरोग्यसेवकसुध्दा भटकत नसल्याचे चित्र आहे.शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावलीतिरोडा तालुक्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण दगावल्यामुळे सर्वत्र सावधगिरीचे वातावरण आहे. शाळांमध्ये दररोज असणारी विद्यार्थी उपस्थिती रोडावल्याची स्थिती आहे. स्वाईन फ्लू एक संसर्गजन्य व गर्दीच्या ठिकाणी पसरणारे रोग असल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांनी तोंडावर रुमाल ठेऊन अध्ययन अध्यापन कार्य केले. विशेष म्हणजे सर्दी, ताप, घसा दुखणे ही स्वाईन फ्लूची मूळ लक्षणे असल्यामुळे असा त्रास असणाºया विद्यार्थ्यांना शाळेतून मधातच सुट्टी देऊन घरी राहणे व औषधोपचाराचा सल्ला दिला जात असल्याची माहिती आहे.