शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अर्जुनी चांदोरी खुर्द मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 9:59 PM

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनव्याने डांबरीकरणाची मागणी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची समस्या कायम आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व मुख्य मार्ग १५ डिसेंबरपर्यत खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र यानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटील यांची घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्री ९.३० वाजेपर्यंत या मार्गावर रहदारी सुरू असते. अर्जुनी ते चांदोरी खुर्द ९ कि.मी. अंतराचा मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता पूर्णत: उखडला असल्याने या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर या मार्गावर अपघात होवून काही वाहन चालकांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती. मागील दोन वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत सावरा येथे २ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण त्याही रस्त्याचे तिनतेरा वाजले आहे. या रस्त्याने रेतीघाट असल्याने ट्रकची मोठी वर्दळ असते. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. अशातच रस्ता उखडल्याने वाहन कोणत्या बाजूने न्यावे असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. हा परिसर तालुक्याचा शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या मार्गावर काही ठिकाणी कामे सुरू करण्यात आले होते. मात्र ते देखील सध्या अर्धवट असल्याचे चित्र आहे.अर्जुनी ते चांदोरी, बिहिरीया, इंदोरा बुज. मार्गाचे सर्व्हेक्षण नियोजनात असल्याचे २० वर्षापासून अधिकारी सांगतात. मात्र अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे कायम आहेत.