शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

शाळेची तुकडी टिकेल तर नोकरी टिकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

देवरी : शासनाने सन २००४-०५ मध्ये राज्यात हजारो उच्च माध्यमिक शाळांची विना अनुदान तत्त्वावर खैरात वाटली. त्यानंतर सन २००८-०९ ...

देवरी : शासनाने सन २००४-०५ मध्ये राज्यात हजारो उच्च माध्यमिक शाळांची विना अनुदान तत्त्वावर खैरात वाटली. त्यानंतर सन २००८-०९ मध्ये परत कायम विना अनुदान तत्त्वावर शाळांना परवानगी दिली. सन २००४ पासून उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना एक रुपया पगार न देता किंवा शाळांना अनुदान न देता शासनाने उच्चशिक्षित शिक्षकांची पिळवणूक केली. शेकडो आंदोलन व मोर्चे काढल्यानंतर मागील ५-६ वर्षांपासून अनुदान मूल्यांकन करून १३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील काही शाळा २० टक्के अनुदानासाठी घोषित केल्या. परंतु या शाळांतील शिक्षकांचा १८ महिन्यांचा पगार घशात घालून १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदान घोषित केले व सध्या या शिक्षकांना पगार सुरू आहे.

सन २०१४ नंतर शासनाने कोणत्याच नियमांचे पालन न करता परत स्वयं अर्थसाहाय्यता या तत्त्वावर मागेल त्याला उच्च माध्यमिक शाळा उघडण्याची परवानगी दिली. सन २००१ पूर्वीचे शाळा उघडण्याचे शासकीय नियम प्राथमिक शाळेसाठी ३ किलोमीटर, माध्यमिक शाळेसाठी ५ किलोमीटर आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी ९ किलोमीटर अशी अट असताना शासनाने स्वयं अर्थसाहाय्य तत्त्वावर मागेल त्याला शाळा देऊन शाळांची खैरात वाटली. आजघडीला कायम विना अनुदान तत्त्वावर शाळा सुरू होत्या त्या ठिकाणी एक तुकडी कशीबशी चालत होती. परंतु स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर उच्च माध्यमिक शाळांना परवानगी दिल्यानंतर आज राज्यातील बऱ्याच उच्च माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु येणाऱ्या काळात जर अशीच अवस्था राहिली तर आज २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळा एके दिवशी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. शासनाने उच्च माध्यमिक शाळेला परवानगी देताना शाळा उघडण्याच्या अटी व शर्ती आहेत त्यांचे पालन करून नवीन शाळांना परवानगी द्यावी.

------------------------------

नोकरी टिकविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी

इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी शिक्षकांमध्ये शर्यती लागल्या आणि विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांना मजुरासारखे गावोगावी फिरावे लागत आहे. उच्च माध्यमिक शाळेत करणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शाळेची तुकडी टिकेल तर नोकरी टिकेल व तुकडी तुटली तर नोकरी जाईल या भीतीने उच्च माध्यमिक शिक्षक दिवसाची रात्र करून ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन देऊन विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करून कशीतरी आपली तुकडी टिकवून ठेवतो.