शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची तुकडी टिकेल तर नोकरी टिकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST

देवरी : शासनाने सन २००४-०५ मध्ये राज्यात हजारो उच्च माध्यमिक शाळांची विना अनुदान तत्त्वावर खैरात वाटली. त्यानंतर सन २००८-०९ ...

देवरी : शासनाने सन २००४-०५ मध्ये राज्यात हजारो उच्च माध्यमिक शाळांची विना अनुदान तत्त्वावर खैरात वाटली. त्यानंतर सन २००८-०९ मध्ये परत कायम विना अनुदान तत्त्वावर शाळांना परवानगी दिली. सन २००४ पासून उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना एक रुपया पगार न देता किंवा शाळांना अनुदान न देता शासनाने उच्चशिक्षित शिक्षकांची पिळवणूक केली. शेकडो आंदोलन व मोर्चे काढल्यानंतर मागील ५-६ वर्षांपासून अनुदान मूल्यांकन करून १३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील काही शाळा २० टक्के अनुदानासाठी घोषित केल्या. परंतु या शाळांतील शिक्षकांचा १८ महिन्यांचा पगार घशात घालून १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदान घोषित केले व सध्या या शिक्षकांना पगार सुरू आहे.

सन २०१४ नंतर शासनाने कोणत्याच नियमांचे पालन न करता परत स्वयं अर्थसाहाय्यता या तत्त्वावर मागेल त्याला उच्च माध्यमिक शाळा उघडण्याची परवानगी दिली. सन २००१ पूर्वीचे शाळा उघडण्याचे शासकीय नियम प्राथमिक शाळेसाठी ३ किलोमीटर, माध्यमिक शाळेसाठी ५ किलोमीटर आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी ९ किलोमीटर अशी अट असताना शासनाने स्वयं अर्थसाहाय्य तत्त्वावर मागेल त्याला शाळा देऊन शाळांची खैरात वाटली. आजघडीला कायम विना अनुदान तत्त्वावर शाळा सुरू होत्या त्या ठिकाणी एक तुकडी कशीबशी चालत होती. परंतु स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर उच्च माध्यमिक शाळांना परवानगी दिल्यानंतर आज राज्यातील बऱ्याच उच्च माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु येणाऱ्या काळात जर अशीच अवस्था राहिली तर आज २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळा एके दिवशी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. शासनाने उच्च माध्यमिक शाळेला परवानगी देताना शाळा उघडण्याच्या अटी व शर्ती आहेत त्यांचे पालन करून नवीन शाळांना परवानगी द्यावी.

------------------------------

नोकरी टिकविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी

इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी शिक्षकांमध्ये शर्यती लागल्या आणि विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांना मजुरासारखे गावोगावी फिरावे लागत आहे. उच्च माध्यमिक शाळेत करणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शाळेची तुकडी टिकेल तर नोकरी टिकेल व तुकडी तुटली तर नोकरी जाईल या भीतीने उच्च माध्यमिक शिक्षक दिवसाची रात्र करून ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन देऊन विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करून कशीतरी आपली तुकडी टिकवून ठेवतो.