शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'आयुष्मान कार्ड'च तयार केले नाही तर मग मोफत उपचार मिळणार कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:37 IST

१२.९९ लाखांचे उद्दिष्ट : ७ लाख लोकांनी काढले आयुष्मान कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही रुग्णांचा उपचाराविना बळी जाऊ नये, या उद्देशाने शासनाने आयुष्मान भारत गोल्डन कार्ड ही योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १२ लाख ९८ हजार ६१६ उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ७ लाख १ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. तर अनेकांनी अद्यापही कार्ड काढले नसून त्यामुळे त्यांना मोफत उपचार कसा मिळणार? असा प्रश्न आहे.

सर्वसामान्य, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला तर त्यावरील खर्चीक उपचार परवडत नाही. त्यामुळे उपचाराविना अशा रुग्णांचा आजार बळावून मृत्यूला सामोरे जावे लागते. आयुष्मान कार्ड काढणाऱ्या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो. आरोग्याच्या विविध उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेले 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' काढण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

जिल्ह्यात ७ लाख नागरिकांना दिले आयुष्मान कार्डजिल्हाभरात ग्रामीण व शहरी अशा एकूण ७ लाख १ नागरिकांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे. जिल्ह्यात १२ लाख ९८ हजार ६१६ उद्दिष्ट आहे.

पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची आहे सुविधाआयुष्मान कार्ड असणाऱ्या लाभार्थीना योजनेत नोंदणीकृत असलेल्या खासगी रुग्णालयात पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतो. मोठमोठ्या आजारांवर उपचार करण्यात येतो. याची सर्वसामान्य नागरिकांना मदत होते.

कागदपत्रे काय लागतात?आयुष्मान कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड लागते. त्यासोबतच आधार कार्डशी मोबाइल लिंक करणे गरजेचे आहे.

कोठे काढाल कार्ड?ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर, आयुष्मान भारत योजनेशी जुळलेले रुग्णालय, यासह आता रेशन दुकानांतसुद्धा आयुष्मान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे.

काय आहे आयुष्मान कार्ड?गरीब व गरजू रेशन कार्डधारकांना मोफत उपचार देण्याच्या अनुषंगाने शासनाने आयुष्मान भारत ही योजना राबविली असून, आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.

१३५६ आजारांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेतून १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. या उपचारासाठी लागणारे पैसे शासन देत असते. सर्व गंभीर आजारावरील उपचार या योजनेतून करण्यात येतात.

"प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित केंद्रावरून लाभार्थीनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. आतापर्यंत ५३ टक्के लोकांनीच हे कार्ड काढले आहे."- डॉ. जयंती पटले, जिल्हा समन्वयक, आयुष्मान भारत योजना

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतgondiya-acगोंदियाHealthआरोग्य