शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

गोेंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सद्य:स्थितीत काही विशेष रेल्वे ...

गोेंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सद्य:स्थितीत काही विशेष रेल्वे गाड्या सुरू असून, लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आल्या नाही. कोरोनाच्या नावाखाली अद्यापही विशेष गाड्या सुरू ठेवून दोन पट तिकीट भाडे अधिक आकारले जात आहे. मागील सहा-सात महिन्यांपासून हा असाच प्रकार सुरू असून, प्रवाशांना गरजेपोटी विशेष गाड्यांचे अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची ही एक प्रकारे लूट सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. एसटी, रेल्वेची वाहतूक सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र यानंतरही रेल्वेने नियमित गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा कमी केला नसून अतिरिक्त भाडे आकारणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे गोंदिया ते नागपूर, कोरोबा-अमृतसर, जबलपूर-चांदाफोर्ट, छत्तीसगड एक्स्प्रेेस, समता एक्स्प्रेस, अजमेर-पुरी, गया-चेन्नई यांसह इतर डझनभर विशेष गाड्यांमध्ये स्लिपरमधून प्रवासाठी प्रति व्यक्ती दोनशे ते तीनशे रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.

..........

प्रवासी म्हणतात...

कोरोनाच्या संसर्गामुळे आधीच अनेकांचा रोजगार गेला आहे. पगारात सुद्धा कपात झाली आहे. अशात रेल्वे विशेष गाड्यांच्या नावावर तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना अजूनही भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाने आता स्थिती पूर्वपदावर आली असल्याने तिकिटांचे दर कमी करायला हवे.

- संतोष वाढई, प्रवासी

................

कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आले असून, रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे. ती आता त्वरित कमी करण्याची गरज आहे. तसेच लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुद्धा त्वरित सुरू कराव्यात.

- राहुल पारखी, प्रवासी

..................

आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी

- रेल्वे गाडीतून गोंदिया ते नागपूर प्रवास करायचा असेल तरी आरक्षण करणे अनिवार्य केले आहे. शिवाय यामुळे अतिरिक्त भाडे सुद्धा प्रवाशांना मोजावे लागत आहे. जवळच्या अंतरासाठी रेल्वे गाड्यांमध्ये जागा उपलब्ध असताना सुद्धा आरक्षण करण्याची अट रद्द करण्याची गरज आहे.

- बरेचदा अनेकांना वेळेवर नागपूर, अमरावती येथे जाण्याची वेळ येते. गोंदिया येथून या ठिकाणी जाण्यास बऱ्याच रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत, मात्र वेळेवर आरक्षण मिळत नसल्याने त्यांना बस गेल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शारीरिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतो. त्यामुळे आरक्षणाची लागू केलेली अट रद्द करण्याची गरज आहे.

................

जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष गाड्या

गोंदिया ते नागपूर,

कोरोबा-अमृतसर,

जबलपूर-चांदाफोर्ट,

छत्तीसगड एक्स्प्रेेस,

समता एक्स्प्रेस,

अजमेर-पुरी, गया-चेन्नई

..................

तिकिटात फरक किती

कोरोनाचा संदर्भ देत रेल्वे विभागाने विशेष गाड्या सुरू केल्या आहे, मात्र गाड्यांचे तिकिटाचे दर सुद्धा दुप्पट आहे. विशेष गाड्यांचे स्लिपरचे दर ४५० हून अधिकच आहे. गोंदिया-नागपूर स्लिपर कोचचे भाडे १७५ रुपये होते. विशेष गाडीमध्ये यासाठी ३५० ते ४०० रुपये मोजावे लागत आहे. विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर दोनशे ते अडिशे रुपयांनी वाढविण्यात आले आहे. त्यामुळे याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसत आहे.