शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोकळ आश्वासनाने देऊन बळीराजाची दिशाभूल कुठवर? ८ तास वीजपुरवठा नावालाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:26 IST

Gondia : अघोषित भारनियमनाने रब्बी पिके संकटात

अंकुश गुंडावार, गोंदिया : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही निपूर्णपणे कृषीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात २ लाख ७० हजार खातेदार शेतकऱ्यांची नोंद आहे. हे शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. यावरच त्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो; पण कधी आसामी तर कधी कृत्रिम संकटांना त्यांना तोंड द्यावे लागते. सध्या जिल्ह्यातील रब्बी धान उत्पादक शेतकरी अघोषित भारनियमनाच्या संकटाला तोंड देत आहे. शेतीला अखंडित आठ तास वीजपुरवठा मिळत नसल्याने रब्बी पिके संकटात आली असून तोंडचा घास हिरावला जाण्याची चिंता त्यांना सतावित आहे, तर शासन आणि लोकप्रतिनिधी त्यांना केवळ आश्वासनाचे डोस देत आहेत. त्यामुळे पोकळ आश्वासन देऊन बळीराजाची दिशाभूल पुन्हा किती दिवस करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

चार-पाच दिवसांपूर्वीच देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिरपूरबांध जलाशयाचे पाणी रब्बीसाठी द्यावे यासाठी आंदोलन केले, तर तिरोडा तालुक्यात सुद्धा हे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील खातिया, चिरामनटोला या परिसरातील धानपीक पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवानी धडपड सुरू आहे. जिल्ह्यात यंदा ४६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील ७० टक्के रोवणीची कामेसुद्धा आटोपली आहे, तर ३० टक्के रोवणी पाण्याअभावी रखडली आहे. 

गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. याच भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बी धान लागवडीच्या क्षेत्रात वाढ केली. शेतकऱ्यांना रब्बीसाठी धापेवाडा, पुजारीटोला, शिरपूरबांध, इटियाडोह या जलाशयाचे पाणी दिले जात आहे, तर काही शेतकऱ्यांनी विहीर व शेततळे करून त्यावर मोटारपंप लावून सिंचनाची सोय केली आहे; पण याला महावितरणच्या अघोषित भारनियमनाचा फटका बसत आहे. कृषिपंपांना अंखडित ६ ते ८ तास वीजपुरवठा होत नसल्याने रब्बीसाठी पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे केलेली रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहेत.

पाणी आहे; पण शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी विजेअभावी मोटारपंप चालत नसल्याने मोठी अडचण होत आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावला जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची केविलवानी धडपड सुरू आहे. महावितरण आणि शासनाकडून ८ तास अखंडित वीजपुरवठ्याचे केवळ पोकळ आश्वासन दिले जात आहे.

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नकाबळीराजा हा आपला अन्नदाता असून त्यांना हलक्यात घेऊ नका, अखंडित आठ तास वीजपुरवठ्याचे केवळ पोकळ आश्वासन नको, तर प्रत्यक्षात आठ तास वीजपुरवठा कसा होईल यासाठी उपाययोजना करा, विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही याची काळजी शासन आणि प्रशासनाने सुद्धा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgondiya-acगोंदिया