शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पोकळ आश्वासनाने देऊन बळीराजाची दिशाभूल कुठवर? ८ तास वीजपुरवठा नावालाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:26 IST

Gondia : अघोषित भारनियमनाने रब्बी पिके संकटात

अंकुश गुंडावार, गोंदिया : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही निपूर्णपणे कृषीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात २ लाख ७० हजार खातेदार शेतकऱ्यांची नोंद आहे. हे शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. यावरच त्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो; पण कधी आसामी तर कधी कृत्रिम संकटांना त्यांना तोंड द्यावे लागते. सध्या जिल्ह्यातील रब्बी धान उत्पादक शेतकरी अघोषित भारनियमनाच्या संकटाला तोंड देत आहे. शेतीला अखंडित आठ तास वीजपुरवठा मिळत नसल्याने रब्बी पिके संकटात आली असून तोंडचा घास हिरावला जाण्याची चिंता त्यांना सतावित आहे, तर शासन आणि लोकप्रतिनिधी त्यांना केवळ आश्वासनाचे डोस देत आहेत. त्यामुळे पोकळ आश्वासन देऊन बळीराजाची दिशाभूल पुन्हा किती दिवस करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

चार-पाच दिवसांपूर्वीच देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिरपूरबांध जलाशयाचे पाणी रब्बीसाठी द्यावे यासाठी आंदोलन केले, तर तिरोडा तालुक्यात सुद्धा हे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील खातिया, चिरामनटोला या परिसरातील धानपीक पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवानी धडपड सुरू आहे. जिल्ह्यात यंदा ४६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील ७० टक्के रोवणीची कामेसुद्धा आटोपली आहे, तर ३० टक्के रोवणी पाण्याअभावी रखडली आहे. 

गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. याच भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बी धान लागवडीच्या क्षेत्रात वाढ केली. शेतकऱ्यांना रब्बीसाठी धापेवाडा, पुजारीटोला, शिरपूरबांध, इटियाडोह या जलाशयाचे पाणी दिले जात आहे, तर काही शेतकऱ्यांनी विहीर व शेततळे करून त्यावर मोटारपंप लावून सिंचनाची सोय केली आहे; पण याला महावितरणच्या अघोषित भारनियमनाचा फटका बसत आहे. कृषिपंपांना अंखडित ६ ते ८ तास वीजपुरवठा होत नसल्याने रब्बीसाठी पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे केलेली रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहेत.

पाणी आहे; पण शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी विजेअभावी मोटारपंप चालत नसल्याने मोठी अडचण होत आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावला जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची केविलवानी धडपड सुरू आहे. महावितरण आणि शासनाकडून ८ तास अखंडित वीजपुरवठ्याचे केवळ पोकळ आश्वासन दिले जात आहे.

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नकाबळीराजा हा आपला अन्नदाता असून त्यांना हलक्यात घेऊ नका, अखंडित आठ तास वीजपुरवठ्याचे केवळ पोकळ आश्वासन नको, तर प्रत्यक्षात आठ तास वीजपुरवठा कसा होईल यासाठी उपाययोजना करा, विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही याची काळजी शासन आणि प्रशासनाने सुद्धा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgondiya-acगोंदिया