शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 9:51 PM

मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी जिल्ह्यात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान असून मे महिन्यातील आत्तापर्यंतच्या तापमानाचे रेकार्ड मोडले आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.

ठळक मुद्दे४४.४ अंश सेल्सिअस : मे महिन्यातील रेकार्ड मोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी जिल्ह्यात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान असून मे महिन्यातील आत्तापर्यंतच्या तापमानाचे रेकार्ड मोडले आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.हवामान विभागाने पुढील दोन आठवडे तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज जिल्ह्यात काही प्रमाणात खरा होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर असल्याने जिल्ह्यावासीयांची चांगलीच होरपळ आहे. जणू सूर्य देवाने गोंदिया जिल्ह्यात मुक्काम ठोकला की असे चित्र होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात घट झाली होती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र मागील तीन चार दिवसांपासून पारा चढण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.२१) या हंगामातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.हे तापमान आजरवचे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळपासूच तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वजण आज तापमान अधिक असल्याचे बोलते होते.वाढत्या तापमानामुळे मंगळवारी दुपारी शहरातील रस्त्यांवर सुध्दा शुकशुकाट पाहयला मिळाला. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी अनेकांनी कुलर, पखें आणि एसीचा आधार घेतला होता. मात्र ४४.४ अंश सेल्सिअस तापमानात ते देखील काम करीत नसल्याने जिल्हावासीयांची चांगलीच होरपळ झाली होती. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यात वाढ झाली होती.कमी विद्युत दाबाने वीज पुरवठातापमानात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वच जण कुलर, पंखे, एसीचा आधार घेत आहेत. मात्र कमी विद्युत दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे ते देखील काम करीत नसल्याने नागरिकांची चांगलीच होरपळ आहे. कधी एकदा पावसाळा सुरु होतो आणि उकाड्यापासून दिलासा मिळतो अशी कामना जिल्हावासीय करीत आहे.