शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:26 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल। अन्यथा परवाना रद्द करणार, बियाण्यांची तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. नोटीसचे उत्तर दिल्यानंतर परवाना रद्द करण्याची कारवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाºया धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली. ज्या शेतकऱ्यांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकऱ्यांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले होते. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले होते. या कंपनीच्या एजंटनी सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कुपनचे वितरण करुन बियाणांचे बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत दिली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने सडक अर्जुनी येथील दोन कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.तसेच कूपन देणे बंद न केल्यास परवाना निलंबित करण्याची तंबी दिली आहे. तसेच नोटीसचे उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.सीमावर्ती भागात शोधमोहीमखरीप हंगामादरम्यान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर्षी कृषी विभागाच्या भरारी पथकाने सीमावर्ती भागातील गावांमध्ये बियाणांची शोध मोहीम मागील आठवडाभरापासून सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती