शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

By admin | Updated: May 9, 2017 00:56 IST

वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, सहायक वन संरक्षक श्री.बिसेन, श्री.शेंडे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा क्र ीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्र माला उपस्थित होते.बिघडलेले पर्यावरण संतुलन आणि जागतिक तापमान वाढीमुळे वृक्ष लागवड करणे ही आज काळाची गरज झाली आहे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीत लोकसहभाग मिळावा आणि मोहिमेला लोकचळवळीचे स्वरु प यावे यासाठी वन विभागाने चित्ररथ तयार केले असून १ मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. वन विभागाचा हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. हा चित्ररथ राज्यभर भ्रमण करणार असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे व ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथाच्या मागच्या भागात मोठी डिजीटल स्क्र ीन असून ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. १ मे ते ३० जून पर्यंत हा चित्ररथ चांदा ते बांधा असा महाराष्ट्रभर प्रवास करु न सर्वच जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.सडक अर्जुनीत स्वागत सडक अर्जुनी : रविवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजता शेंडा फाटा येथे चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती कविता रंगारी, नगराध्यक्ष रिता लांजेवार, माजी आमदार दयाराम कापगते, नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम, कोहमाराच्या सरपंच माया उईके, वनक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, क्षेत्र सहायक प्रमोद फुले, विलास बेलखोडे, सुनील खांडेकर, नागपुरे, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, राजेश कठाणे, लिना पटोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनाचे महत्व, वृक्षारोपण काळाची गरज, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देण्यात आली.चित्ररथाला हिरवी झेंडीसालेकसा : पर्यावरणाचा संतुलन साधण्याच्या दिशेने काम करणे गरजेचे असून यासाठी वृक्ष संरक्षण व वृक्ष संवर्धन सारखे उपक्रम गांभीर्याने राबविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम हाती घेतला असून लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी चित्ररथ यात्रा काढण्यात येत आहे. या चित्ररथाचे नुकतेच सालेकसा येथे आगमन झाले. त्यावेळी वन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर चित्ररथाचे भव्य स्वागत केले. वृक्ष लागवडीचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाचे स्वागत करण्यासाठी सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्राधिकारी पी.एस. मेंढे, एस.के. पटले, एस.ए. घुघे, पी.बी. साखरे, वनरक्षक एम.व्ही. शामकुवर, एस.आर. सोनवाने, एम.आर. येटरे, ई.सी. कापसे, एस.एल. पांडे, एस.बी. भेलावे, डी.डी. कटरे, एस.बी. कटरे, वाय.सी. नागपुरे, एम.आर. येटरे, ए.बी. मेश्राम, बी.एम. र हांगडाले, डी.डी. कोकोडे, मिलिंद मेश्राम, सुनील रहांगडाले आदी वन विभागाच्या कार्यालयसमोर उपस्थित दर्शविली आणि चित्ररथाचे स्वागत केले. चित्ररथाबद्दल यावेळी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सालेकसा येथे नगर भ्रमण करुन शेवटी हिरवी झेंडी दाखवून आमगावकडे रवाना करण्यात आले.