शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

By admin | Updated: May 9, 2017 00:56 IST

वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, सहायक वन संरक्षक श्री.बिसेन, श्री.शेंडे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा क्र ीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्र माला उपस्थित होते.बिघडलेले पर्यावरण संतुलन आणि जागतिक तापमान वाढीमुळे वृक्ष लागवड करणे ही आज काळाची गरज झाली आहे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीत लोकसहभाग मिळावा आणि मोहिमेला लोकचळवळीचे स्वरु प यावे यासाठी वन विभागाने चित्ररथ तयार केले असून १ मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. वन विभागाचा हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. हा चित्ररथ राज्यभर भ्रमण करणार असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे व ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथाच्या मागच्या भागात मोठी डिजीटल स्क्र ीन असून ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. १ मे ते ३० जून पर्यंत हा चित्ररथ चांदा ते बांधा असा महाराष्ट्रभर प्रवास करु न सर्वच जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.सडक अर्जुनीत स्वागत सडक अर्जुनी : रविवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजता शेंडा फाटा येथे चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती कविता रंगारी, नगराध्यक्ष रिता लांजेवार, माजी आमदार दयाराम कापगते, नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम, कोहमाराच्या सरपंच माया उईके, वनक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, क्षेत्र सहायक प्रमोद फुले, विलास बेलखोडे, सुनील खांडेकर, नागपुरे, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, राजेश कठाणे, लिना पटोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनाचे महत्व, वृक्षारोपण काळाची गरज, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देण्यात आली.चित्ररथाला हिरवी झेंडीसालेकसा : पर्यावरणाचा संतुलन साधण्याच्या दिशेने काम करणे गरजेचे असून यासाठी वृक्ष संरक्षण व वृक्ष संवर्धन सारखे उपक्रम गांभीर्याने राबविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम हाती घेतला असून लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी चित्ररथ यात्रा काढण्यात येत आहे. या चित्ररथाचे नुकतेच सालेकसा येथे आगमन झाले. त्यावेळी वन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर चित्ररथाचे भव्य स्वागत केले. वृक्ष लागवडीचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाचे स्वागत करण्यासाठी सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्राधिकारी पी.एस. मेंढे, एस.के. पटले, एस.ए. घुघे, पी.बी. साखरे, वनरक्षक एम.व्ही. शामकुवर, एस.आर. सोनवाने, एम.आर. येटरे, ई.सी. कापसे, एस.एल. पांडे, एस.बी. भेलावे, डी.डी. कटरे, एस.बी. कटरे, वाय.सी. नागपुरे, एम.आर. येटरे, ए.बी. मेश्राम, बी.एम. र हांगडाले, डी.डी. कोकोडे, मिलिंद मेश्राम, सुनील रहांगडाले आदी वन विभागाच्या कार्यालयसमोर उपस्थित दर्शविली आणि चित्ररथाचे स्वागत केले. चित्ररथाबद्दल यावेळी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सालेकसा येथे नगर भ्रमण करुन शेवटी हिरवी झेंडी दाखवून आमगावकडे रवाना करण्यात आले.