शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सामूहिक सोहळे समाजाला पोषक

By admin | Updated: May 12, 2017 01:18 IST

सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते.

सहषराम कोरोटे : आदिवासी हलबा-हलबी सामूहिक विवाह समारंभ लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते. त्याचबरोबर समाजात एकोपा व सलोखा निर्माण होऊन एका संघटित समाजाची उभारणी होते. त्यामुळे आज सामूहिक विवाह सोहळा सामाजिक सुदृढतेला पोषक ठरत आहे, असे प्रतिपादन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले. ते हलबीटोला (सालेकसा) येथे आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी समाजबांधवासह उपस्थित सर्व लोकांसमोर विचार व्यक्त करीत होते. सर्वच समाजातील शिक्षिक व समजदार लोकांनी सामूहिक विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनसुद्धा कोरोटे यांनी केले. हलबीटोला (सालेकसा) येथील सामूहिक विवाह सोहळ्यात आदिवासी हलबा-हलबी समाजाचे एकूण आठ जोडपे विवाह बंधनात बांधले गेले असून सामाजिक प्रथा परंपरेनुसार त्यांचे शुभ मंगल कार्यक्रम पार पडले. उद्घाटन आमगाव-देवीरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते, डॉ.एन.डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यत आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून आदिवासी नेते सहषराम कोरोटे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, माजी आ. रामरतन राऊत, जि.प. सदस्य लता दोनोडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, माजी जि.प. सदस्य रामाजी गावराने, भाजप अध्यक्ष परसराम फुंडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोहन क्षीरसागर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष शंकर मडावी, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ. विठ्ठल भोयर, समाजाचे सचिव अजय कोटेवार यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मंडळी आणि समाजबांधव वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात सहषराम कोरोटे पुढे म्हणाले, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींचे लग्न केल्याने खर्चाची मोठी बचत होते. त्या पैशाचा उपयोग मुलांना चांगला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी केला तर समाजाची व कुटुंबाची प्रगती घडवून येईल. कुटुंब प्रगत झाल्यातर समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व समितीद्वारे करण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला. संचालन राजेश भोयर यांनी केले. आभार राजू राऊत यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांनी नवदाम्पत्यांना भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिला. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी किशोर गावराने, राजेश प्रधान, जे.आर. गावराने, श्रीराम भोयर, प्रमोद राऊत, देवचंद चौधरी, यू.जी. पिसदे, हेमराज राऊत, खेमराज घरत, आर.एल. राणे, मोहन प्रधान, संजय भोयर, अशोक गावराने, अनिल कुमडे, तसेच आदिवासी हलबा-हलबी कर्मचारी संघटनेने सहकार्य केले.