शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक सोहळे समाजाला पोषक

By admin | Updated: May 12, 2017 01:18 IST

सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते.

सहषराम कोरोटे : आदिवासी हलबा-हलबी सामूहिक विवाह समारंभ लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते. त्याचबरोबर समाजात एकोपा व सलोखा निर्माण होऊन एका संघटित समाजाची उभारणी होते. त्यामुळे आज सामूहिक विवाह सोहळा सामाजिक सुदृढतेला पोषक ठरत आहे, असे प्रतिपादन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले. ते हलबीटोला (सालेकसा) येथे आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी समाजबांधवासह उपस्थित सर्व लोकांसमोर विचार व्यक्त करीत होते. सर्वच समाजातील शिक्षिक व समजदार लोकांनी सामूहिक विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनसुद्धा कोरोटे यांनी केले. हलबीटोला (सालेकसा) येथील सामूहिक विवाह सोहळ्यात आदिवासी हलबा-हलबी समाजाचे एकूण आठ जोडपे विवाह बंधनात बांधले गेले असून सामाजिक प्रथा परंपरेनुसार त्यांचे शुभ मंगल कार्यक्रम पार पडले. उद्घाटन आमगाव-देवीरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते, डॉ.एन.डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यत आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून आदिवासी नेते सहषराम कोरोटे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, माजी आ. रामरतन राऊत, जि.प. सदस्य लता दोनोडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, माजी जि.प. सदस्य रामाजी गावराने, भाजप अध्यक्ष परसराम फुंडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोहन क्षीरसागर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष शंकर मडावी, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ. विठ्ठल भोयर, समाजाचे सचिव अजय कोटेवार यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मंडळी आणि समाजबांधव वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात सहषराम कोरोटे पुढे म्हणाले, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींचे लग्न केल्याने खर्चाची मोठी बचत होते. त्या पैशाचा उपयोग मुलांना चांगला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी केला तर समाजाची व कुटुंबाची प्रगती घडवून येईल. कुटुंब प्रगत झाल्यातर समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व समितीद्वारे करण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला. संचालन राजेश भोयर यांनी केले. आभार राजू राऊत यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांनी नवदाम्पत्यांना भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिला. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी किशोर गावराने, राजेश प्रधान, जे.आर. गावराने, श्रीराम भोयर, प्रमोद राऊत, देवचंद चौधरी, यू.जी. पिसदे, हेमराज राऊत, खेमराज घरत, आर.एल. राणे, मोहन प्रधान, संजय भोयर, अशोक गावराने, अनिल कुमडे, तसेच आदिवासी हलबा-हलबी कर्मचारी संघटनेने सहकार्य केले.