शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सामूहिक सोहळे समाजाला पोषक

By admin | Updated: May 12, 2017 01:18 IST

सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते.

सहषराम कोरोटे : आदिवासी हलबा-हलबी सामूहिक विवाह समारंभ लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते. त्याचबरोबर समाजात एकोपा व सलोखा निर्माण होऊन एका संघटित समाजाची उभारणी होते. त्यामुळे आज सामूहिक विवाह सोहळा सामाजिक सुदृढतेला पोषक ठरत आहे, असे प्रतिपादन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले. ते हलबीटोला (सालेकसा) येथे आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी समाजबांधवासह उपस्थित सर्व लोकांसमोर विचार व्यक्त करीत होते. सर्वच समाजातील शिक्षिक व समजदार लोकांनी सामूहिक विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनसुद्धा कोरोटे यांनी केले. हलबीटोला (सालेकसा) येथील सामूहिक विवाह सोहळ्यात आदिवासी हलबा-हलबी समाजाचे एकूण आठ जोडपे विवाह बंधनात बांधले गेले असून सामाजिक प्रथा परंपरेनुसार त्यांचे शुभ मंगल कार्यक्रम पार पडले. उद्घाटन आमगाव-देवीरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते, डॉ.एन.डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यत आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून आदिवासी नेते सहषराम कोरोटे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, माजी आ. रामरतन राऊत, जि.प. सदस्य लता दोनोडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, माजी जि.प. सदस्य रामाजी गावराने, भाजप अध्यक्ष परसराम फुंडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोहन क्षीरसागर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष शंकर मडावी, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ. विठ्ठल भोयर, समाजाचे सचिव अजय कोटेवार यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मंडळी आणि समाजबांधव वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात सहषराम कोरोटे पुढे म्हणाले, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींचे लग्न केल्याने खर्चाची मोठी बचत होते. त्या पैशाचा उपयोग मुलांना चांगला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी केला तर समाजाची व कुटुंबाची प्रगती घडवून येईल. कुटुंब प्रगत झाल्यातर समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व समितीद्वारे करण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला. संचालन राजेश भोयर यांनी केले. आभार राजू राऊत यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांनी नवदाम्पत्यांना भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिला. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी किशोर गावराने, राजेश प्रधान, जे.आर. गावराने, श्रीराम भोयर, प्रमोद राऊत, देवचंद चौधरी, यू.जी. पिसदे, हेमराज राऊत, खेमराज घरत, आर.एल. राणे, मोहन प्रधान, संजय भोयर, अशोक गावराने, अनिल कुमडे, तसेच आदिवासी हलबा-हलबी कर्मचारी संघटनेने सहकार्य केले.