शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. 

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : इंटरनेटची असल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इंटनेटची समस्या येत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण होत होती. याचीच दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. ही अडचण लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी सोमवारी राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मागणी केली होती. त्यावर मदान यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राज्यात इतर ठिकाणी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुका स्तरावर उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. निवडणूूक लढवू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील पत्र सुध्दा मंगळवारी काढले आहे. जात प्रणाणपत्र तपासणीचे अर्ज सुध्दा घेणार ऑफलाईन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अट होती. पण ग्रामीण भागात इंटरनेटच्या समस्येमुळे ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे जात होते. ही समस्या लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालकांशी चर्चा करुन ऑफलाईन अर्ज स्विकारण्या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हे अर्ज सुध्दा ऑफ लाईन बुधवारी रात्री उशीरापर्यंत स्विकारले जाणार आहे.चार दिवसात केवळ ६६ अर्जजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी २३ डिसेंबरपासूृन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता मागील चार दिवसात केवळ ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ऑनलाईन प्रकियेमुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण जात होती. त्यामुळे चार दिवसात केवळ ६६ अर्ज दाखल झाले होते.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक