शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

ग्रामपंचायतचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. 

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : इंटरनेटची असल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इंटनेटची समस्या येत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण होत होती. याचीच दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. ही अडचण लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी सोमवारी राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मागणी केली होती. त्यावर मदान यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राज्यात इतर ठिकाणी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुका स्तरावर उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. निवडणूूक लढवू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील पत्र सुध्दा मंगळवारी काढले आहे. जात प्रणाणपत्र तपासणीचे अर्ज सुध्दा घेणार ऑफलाईन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अट होती. पण ग्रामीण भागात इंटरनेटच्या समस्येमुळे ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे जात होते. ही समस्या लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालकांशी चर्चा करुन ऑफलाईन अर्ज स्विकारण्या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हे अर्ज सुध्दा ऑफ लाईन बुधवारी रात्री उशीरापर्यंत स्विकारले जाणार आहे.चार दिवसात केवळ ६६ अर्जजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी २३ डिसेंबरपासूृन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता मागील चार दिवसात केवळ ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ऑनलाईन प्रकियेमुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण जात होती. त्यामुळे चार दिवसात केवळ ६६ अर्ज दाखल झाले होते.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक