शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

ग्रामपंचायतचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. 

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : इंटरनेटची असल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इंटनेटची समस्या येत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण होत होती. याचीच दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. ही अडचण लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी सोमवारी राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मागणी केली होती. त्यावर मदान यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राज्यात इतर ठिकाणी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुका स्तरावर उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. निवडणूूक लढवू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील पत्र सुध्दा मंगळवारी काढले आहे. जात प्रणाणपत्र तपासणीचे अर्ज सुध्दा घेणार ऑफलाईन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अट होती. पण ग्रामीण भागात इंटरनेटच्या समस्येमुळे ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे जात होते. ही समस्या लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालकांशी चर्चा करुन ऑफलाईन अर्ज स्विकारण्या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हे अर्ज सुध्दा ऑफ लाईन बुधवारी रात्री उशीरापर्यंत स्विकारले जाणार आहे.चार दिवसात केवळ ६६ अर्जजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी २३ डिसेंबरपासूृन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता मागील चार दिवसात केवळ ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ऑनलाईन प्रकियेमुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण जात होती. त्यामुळे चार दिवसात केवळ ६६ अर्ज दाखल झाले होते.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक