शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

गोंदियावासीयांना मिळणार एकवेळ पूर्ण पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 8:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोमीटर अंतरावरील पुजारीटोला धरणातून बाघ नदी पात्रात पाणी आणले आहे. सध्या डांगोरली घाटात १५ कोटी लिटर ...

ठळक मुद्देप्रथमच ९० किलोमीटरची पायपीट : नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांचे संयुक्त प्रयत्न फळाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोमीटर अंतरावरील पुजारीटोला धरणातून बाघ नदी पात्रात पाणी आणले आहे. सध्या डांगोरली घाटात १५ कोटी लिटर पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गोंदियावासीयांना यापुढे दिवसाला एका वेळेला नियमति पाणी पुरवठा केला जाणार आहे .गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातून वाहणाऱ्या बाघ नदीवर डांगोर्ली गावात उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून गोंदिया शहरातील १३ हजार घरांना दररोज १ कोटी लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे नदी पात्रातील पाणी आटले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गोंदिया नगर परिषदेसमोर पाणी प्रश्न पेटले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन यंदा बिघडणार असल्याचे लक्षात घेऊन नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांची जानेवारी महिन्यापासून या समस्येवर तोडगा काढण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी पाण्याच्या नियोजनसंबंधी चर्चा सुरू होती.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी अनेकवेळा संयुक्त बैठका नगर पालिकेने घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून डांगोरली घाटातील पाण्याचे स्तोत्र आटल्यामुळे शहरात फक्त १० मिनिटे पाणी सोडण्यात येत होते. नगर पालिकेच्या विनंतीला मान देत आणि गोंदिया शहरातील पाणी संकट टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत डांगोरली घाटापासून ९० किलोमीटर दूर असलेल्या पुजारीटोला धरणातील पाणी सोडण्यास परवानगी दिली. त्याकरिता ९ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला. १०० क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. आजघडीला डांगोरली घाटात १५ हजार कोटी लिटर पाणी जमा झाले आहे.गोंदिया शहरात असलेल्या तब्बल १३ हजार नळ कनेक्शन धारकांना सध्याच्या घडीला दर दिवशी दोन वेळा पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी लिटर पाणी लागत आहे. सद्यस्थितीत चार दिवसांत १०० क्यूसेकच्या गतीने सोडण्यात आलेला १५ कोटी लिटर पाणी नदी पात्रात तयार करण्यात आलेल्या बंधाºयात जमा झाले आहे. एक महिना एका वेळेला पुरेल इतके पाणी नदी पात्रात जमा झाले असून लवकरच पाणी पातळी वाढताच दोन वेळेला देखील पाणी पुरवठा सुरळीत करू, असा विश्वास नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यक्त केला आहे.जिलाधिकारी काळे आणि नागरध्यक्ष इंगळे यांनी रविवारी (दि.२२) डांगोरली घाटाची संयुक्त पाहणी केली. घाटात आलेल्या पाण्याचे दोघांद्वारे संयुक्त जलपूजन करण्यात आले. उपसा सिंचन योजनेतून पाण्याची उचल करण्यात येत असून पुढच्या वर्षी भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी बाग नदीवर पाणी अडविण्यासाठी मोठा बंधारा बांधण्यात यावे, याकरिता जिलाधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेंट घेऊन सदर बंधारा त्वरित बांधन्यात यावे या करिता निवेदन करणार आहेत.नगराध्यक्ष अशोक इंगले यांनी सदर बंधारा उंच करण्याकरिता निवेदन केले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बंधारा दोन फूट उंच करण्याकरिता त्वरित आदेश दिले. येत्या काळात पाण्याची भीषणता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि गरजेपुरताच करावा, असे आवाहन नगर परिषदेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे चंद्रिकापुरे, पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे, पालिकेचे सदस्य दिलीप गोपलानी, विवेक मिश्रा, चंद्रभान तरोने, सतीश मेश्राम, महेंद्र माने, राहुल लोहाना, अजिंक्य इंगळे, योगेश गिरीया, सुमित तिवारी, नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोरलीतशहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी ९० किलोमीटर अंतर कापून पाणी आणण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. डांगोरली घाटापासून ९० किलोमीटर दूर अंतराच्या पुजारीटोला धरणातील पाणी डांगोरली घाटात सोडण्यासाठी ९ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला. त्यानंतर १०० क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. आज डांगोरली घाटात १५ हजार कोटी लिटर पाणी जमा झाला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई