शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियावासीयांना मिळणार एकवेळ पूर्ण पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोमीटर अंतरावरील पुजारीटोला धरणातून बाघ नदी पात्रात पाणी आणले आहे. सध्या डांगोरली घाटात १५ कोटी लिटर ...

ठळक मुद्देप्रथमच ९० किलोमीटरची पायपीट : नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांचे संयुक्त प्रयत्न फळाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोमीटर अंतरावरील पुजारीटोला धरणातून बाघ नदी पात्रात पाणी आणले आहे. सध्या डांगोरली घाटात १५ कोटी लिटर पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गोंदियावासीयांना यापुढे दिवसाला एका वेळेला नियमति पाणी पुरवठा केला जाणार आहे .गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातून वाहणाऱ्या बाघ नदीवर डांगोर्ली गावात उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून गोंदिया शहरातील १३ हजार घरांना दररोज १ कोटी लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे नदी पात्रातील पाणी आटले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गोंदिया नगर परिषदेसमोर पाणी प्रश्न पेटले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन यंदा बिघडणार असल्याचे लक्षात घेऊन नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांची जानेवारी महिन्यापासून या समस्येवर तोडगा काढण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी पाण्याच्या नियोजनसंबंधी चर्चा सुरू होती.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी अनेकवेळा संयुक्त बैठका नगर पालिकेने घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून डांगोरली घाटातील पाण्याचे स्तोत्र आटल्यामुळे शहरात फक्त १० मिनिटे पाणी सोडण्यात येत होते. नगर पालिकेच्या विनंतीला मान देत आणि गोंदिया शहरातील पाणी संकट टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत डांगोरली घाटापासून ९० किलोमीटर दूर असलेल्या पुजारीटोला धरणातील पाणी सोडण्यास परवानगी दिली. त्याकरिता ९ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला. १०० क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. आजघडीला डांगोरली घाटात १५ हजार कोटी लिटर पाणी जमा झाले आहे.गोंदिया शहरात असलेल्या तब्बल १३ हजार नळ कनेक्शन धारकांना सध्याच्या घडीला दर दिवशी दोन वेळा पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी लिटर पाणी लागत आहे. सद्यस्थितीत चार दिवसांत १०० क्यूसेकच्या गतीने सोडण्यात आलेला १५ कोटी लिटर पाणी नदी पात्रात तयार करण्यात आलेल्या बंधाºयात जमा झाले आहे. एक महिना एका वेळेला पुरेल इतके पाणी नदी पात्रात जमा झाले असून लवकरच पाणी पातळी वाढताच दोन वेळेला देखील पाणी पुरवठा सुरळीत करू, असा विश्वास नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यक्त केला आहे.जिलाधिकारी काळे आणि नागरध्यक्ष इंगळे यांनी रविवारी (दि.२२) डांगोरली घाटाची संयुक्त पाहणी केली. घाटात आलेल्या पाण्याचे दोघांद्वारे संयुक्त जलपूजन करण्यात आले. उपसा सिंचन योजनेतून पाण्याची उचल करण्यात येत असून पुढच्या वर्षी भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी बाग नदीवर पाणी अडविण्यासाठी मोठा बंधारा बांधण्यात यावे, याकरिता जिलाधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेंट घेऊन सदर बंधारा त्वरित बांधन्यात यावे या करिता निवेदन करणार आहेत.नगराध्यक्ष अशोक इंगले यांनी सदर बंधारा उंच करण्याकरिता निवेदन केले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बंधारा दोन फूट उंच करण्याकरिता त्वरित आदेश दिले. येत्या काळात पाण्याची भीषणता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि गरजेपुरताच करावा, असे आवाहन नगर परिषदेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे चंद्रिकापुरे, पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे, पालिकेचे सदस्य दिलीप गोपलानी, विवेक मिश्रा, चंद्रभान तरोने, सतीश मेश्राम, महेंद्र माने, राहुल लोहाना, अजिंक्य इंगळे, योगेश गिरीया, सुमित तिवारी, नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोरलीतशहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी ९० किलोमीटर अंतर कापून पाणी आणण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. डांगोरली घाटापासून ९० किलोमीटर दूर अंतराच्या पुजारीटोला धरणातील पाणी डांगोरली घाटात सोडण्यासाठी ९ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला. त्यानंतर १०० क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. आज डांगोरली घाटात १५ हजार कोटी लिटर पाणी जमा झाला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई