शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

गोंदियात कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:45 PM

पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांपासून योजना बंद मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्ट जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करून त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित होणार की भंगारात जमा होणार असा प्रश्न पडला आहे.सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी तीन कोटी रूपये खर्च करुन दहा गावाकरिता ही योजना महाराष्टजीवन प्राधीकरणने पूर्ण केली. सन २००३-०४ मध्ये ही योजना पूर्ण झाली. देव्हाडी, ढोरवाडा, चारगाव, हिंगणा, हसारा, खापा, परसवाडा (दे), तुडका, तामसवाडी आदी गावाकरिता ही योजना आहे. योजना पुर्णत्वास आल्यानंतर १० वर्षांपासून बंद आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर ती चालवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता.जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे ही योजना बंद स्थितीत होती. या योजनेत लाभ घेणाऱ्या गावांनी शिखर परिषद तयार करून पाणीपट्टी वसूली करून ही योजना चालविण्याचा अधिकार संबंधित गावांना देण्यात आला, परंतु आमदनी अठण्णी व खर्चा रूपय्या अशी या योजनेची स्थिती असल्याने येथे कुणीही तसा प्रयत्न केला नाही. सर्वच अपवाद वगळता ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.या योजनेची पाईपलाईन गळती, नविन पाईपलाईन घालणे, लिकेज दुरुस्ती करणे, पंप दुरुस्ती करणे येथे करण्याची गरज आहे.सन २०१४-२०१५ मध्ये तशी कामे करण्यात आली. मुख्यमंत्री पेयजल योजनेत ३१ डिसेंबर २०१६ मध्ये समावेश करण्यात आला. तसे प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्हा स्तरावर पाणीपूरवठा योजनेचे स्वतंत्र कार्यालय असून अभियंते व इतर कर्मचारी आहेत.यासंदर्भात संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाल्यानंतर पाणी पुरवठा केव्हा केला जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेसंदर्भात आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी निवेदन देऊन ही योजना सुरू करण्याची मागणी केलेली आहे.पाणी पुरवठा योजनेला शासनाने प्राधान्यक्रम देऊन योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे नाव या योजनेला दिले आहे. निदान पेयजल योजना तरी शासनाने मार्गी लावावी.- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य देव्हाडी

मुख्यमंत्री पेयजल योजनेत देव्हाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा समावेश होऊन एक वर्ष लोटत आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. आ. परिणय फुके यांनी भेटून पाठपुरावा करणार आहे.- राकेश सिंगाडे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा (दे.)

टॅग्स :Waterपाणी