शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

गोंदिया,तिरोडा तालुक्यातील गावांना पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:36 PM

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, मुरदाडा,किडंगीपार,घाटकुरोडा तर गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राम्हणटोला, ढीवरटोली, डांर्गोली येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ : आठ मार्ग बंद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लागली कामाला

पिकांचे नुकसानवैनगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतामध्ये साचल्याने रोवणी वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी रात्रीपासून हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.१३ वर्षांनंतर प्रथमच पूर परिस्थितीवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याची घटना २००६ मध्ये घडली होती. त्यानंतर यंदा म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर तशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.धापेवाडा, अत्री, चांदोरी खुर्द, मुरदाडा,किडंगीपार,घाटकुरोडा तर गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राम्हणटोला, ढीवरटोली, डांर्गोली येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गावकऱ्यांमध्ये रोषतिरोडा तालुक्यातील नदी काठालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीचे पाणी साचले आहे. मात्र याची माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी कुठलाच संपर्क न केल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.धापेवाडा येथे घरांमध्ये साचले पाणीतिरोडा तालुक्यातील धापेवाडा हे गाव वैनगंगा नदीच्या तीरावर वसले असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या गावातील काही घरांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे.तर काही ठिकाणी घरांची सुध्दा पडझड झाली आहे.धरणाचे दरवाजे केले बंदसालेकसा तालुक्यातील पुजारीटोला, कालीसराड धरणाचे दरवाजे रविवारी उघडण्यात आले होते.त्यामुळे काही मार्ग बंद झाले होते.मात्र सोमवारी सकाळी या दोन्ही धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. इटियाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.१०६ सहा नागरिकांना हलविलेवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील ढिवरीटोली गावात पाणी शिरले.यामुळे येथील गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने बोटीच्या मदतीने बाहेर काढले. तसेच तिरोडा तालुक्यातील किडंगीपार येथील १०६ नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांना गोंडमोहाडी येथील लक्ष्मणराव मानकर आदिवासी आश्रम शाळेत ठेवण्यात आले.चार मजुरांना काढले सुखरुप बाहेरसोमवारी वैनगंगा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील किन्ही येथील रेतीघाटावर काम करीत असलेले चार मजूर अडकले होते. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले.यात दिलीपसिंह मोहनसिंह गौर, संदीप यादव, रुहमसिंग सैनी, सुनिलसिंग या चार जणांचा समावेश आहे.

टॅग्स :floodपूर