शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

गोंदिया जिल्हा होणार निर्बंधमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले होते. यामुळे विवाह सोहळे, अंत्ययात्रेतील  संख्या निश्चित करून दिली होती. तर जिम, नाट्यगृह, सिमेनागृह, जलतरण तलाव, पर्यटन स्थळे याठिकाणी निर्बंध लागू केले हाेते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील काही जिल्ह्यांमध्ये नगण्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य शासनाने बुधवारी (दि.२) ७० टक्केच्यावर लसीकरण, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या, रुग्णवाढीचा दर या निकषावर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गोंदिया जिल्ह्याचासुध्दा समावेश आहे. जिल्हा अ श्रेणीत असल्याने निर्बंधमुक्त करण्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी येत्या दोन तीन दिवसात काढणार असल्याची माहिती आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले होते. यामुळे विवाह सोहळे, अंत्ययात्रेतील  संख्या निश्चित करून दिली होती. तर जिम, नाट्यगृह, सिमेनागृह, जलतरण तलाव, पर्यटन स्थळे याठिकाणी निर्बंध लागू केले हाेते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील काही जिल्ह्यांमध्ये नगण्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यात पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे या जिल्ह्यात लागू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक नियम पूर्णपणे शिथिल होणार आहेत. गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच टप्प्यात समावेश असल्याने ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. 

७४ टक्के नागरिकांनी घेतले दोन्ही डोज- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात गोंदिया जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ७४ टक्के नागरिकांनी आतापर्यंत लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. तर १५ ते १७ वयोगटातील ६८.१८ टक्के मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यावर असल्याने जिल्ह्याचा अ श्रेणीत समावेश झाल्याची माहिती आहे. 

कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सातवर - मागील महिनाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून कोरोना ॲक़्टिव्ह रुग्णांची संख्या सातवर आली आहे. तर आठपैकी पाच तालुके कोरोनामुक्त झाले असून केवळ गोंदिया, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातच दोन तीन रुग्ण आहे. दोन वर्षांनंतर होणार निर्बंध पूर्णपणे शिथिल- मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाने निर्बंध लागू केेले होते. त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर निर्बंध होते. मात्र आता जिल्ह्याचा अ श्रेणीत समावेश झाल्याने जिल्हा १०० टक्के निर्बंधमुक्त होणार आहे. तर जिल्हाधिकारी यासंदर्भातील आदेश काढणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या