शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा होणार निर्बंधमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले होते. यामुळे विवाह सोहळे, अंत्ययात्रेतील  संख्या निश्चित करून दिली होती. तर जिम, नाट्यगृह, सिमेनागृह, जलतरण तलाव, पर्यटन स्थळे याठिकाणी निर्बंध लागू केले हाेते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील काही जिल्ह्यांमध्ये नगण्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य शासनाने बुधवारी (दि.२) ७० टक्केच्यावर लसीकरण, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या, रुग्णवाढीचा दर या निकषावर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गोंदिया जिल्ह्याचासुध्दा समावेश आहे. जिल्हा अ श्रेणीत असल्याने निर्बंधमुक्त करण्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी येत्या दोन तीन दिवसात काढणार असल्याची माहिती आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले होते. यामुळे विवाह सोहळे, अंत्ययात्रेतील  संख्या निश्चित करून दिली होती. तर जिम, नाट्यगृह, सिमेनागृह, जलतरण तलाव, पर्यटन स्थळे याठिकाणी निर्बंध लागू केले हाेते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील काही जिल्ह्यांमध्ये नगण्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यात पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे या जिल्ह्यात लागू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक नियम पूर्णपणे शिथिल होणार आहेत. गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच टप्प्यात समावेश असल्याने ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. 

७४ टक्के नागरिकांनी घेतले दोन्ही डोज- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात गोंदिया जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ७४ टक्के नागरिकांनी आतापर्यंत लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. तर १५ ते १७ वयोगटातील ६८.१८ टक्के मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यावर असल्याने जिल्ह्याचा अ श्रेणीत समावेश झाल्याची माहिती आहे. 

कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सातवर - मागील महिनाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून कोरोना ॲक़्टिव्ह रुग्णांची संख्या सातवर आली आहे. तर आठपैकी पाच तालुके कोरोनामुक्त झाले असून केवळ गोंदिया, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातच दोन तीन रुग्ण आहे. दोन वर्षांनंतर होणार निर्बंध पूर्णपणे शिथिल- मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाने निर्बंध लागू केेले होते. त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर निर्बंध होते. मात्र आता जिल्ह्याचा अ श्रेणीत समावेश झाल्याने जिल्हा १०० टक्के निर्बंधमुक्त होणार आहे. तर जिल्हाधिकारी यासंदर्भातील आदेश काढणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या