शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा अजूनही तहानलेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. धानपीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते. सिंचन सुविधा व पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी धानपिकाला पोषक अशी पर्जन्यवृष्टी झालीच नाही. बरीचशी रोवणी अद्याप झाली नाही यावरून पावसाची परिस्थिती लक्षात येऊ शकते. 

संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : आगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी अडकली आहे. धरण, तलाव अद्याप भरले नाहीत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. उजाडतो तो दिवस तसाच मावळतो, त्यामुळे शेतकरी चिंतातुर दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. धानपीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते. सिंचन सुविधा व पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी धानपिकाला पोषक अशी पर्जन्यवृष्टी झालीच नाही. बरीचशी रोवणी अद्याप झाली नाही यावरून पावसाची परिस्थिती लक्षात येऊ शकते. ११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ७५४.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ६२२ मिमी पाऊस झाला आहे. १३२.६ मिमी पावसाची तूट आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांची रोवणी झाली खरी, मात्र पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह हे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे मोठे धरण आहे. मात्र, त्यात केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने प्रशासन सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याची जोखीम स्वीकारत नाही. यासाठी कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ६ ऑगस्टपर्यंत इटियाडोह धरणातून पाणी सोडण्यात आले होते. ते बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवू नये हा या मागील हेतू आहे. ओलिताखाली जी शेतजमीन आहे, ते शेतकरी समाधानी आहेत. मात्र, कोरडवाहू क्षेत्रात असमाधान आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

दोन तालुक्यांत दयनीय अवस्था - आमगाव व सडक अर्जुनी तालुक्याची अवस्था दयनीय आहे. या तालुक्यांत तर सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टीचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते. अद्यापतरी हे भाकीत खरे होताना दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षी पर्जन्यवृष्टी सरासरी गाठेल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. धान शेतीला वेळोवेळी पाण्याची गरज असते. अवेळी पाऊस आलेले चालत नाही. यंदा मात्र अजिबात तसे चित्र दिसून येत नाही. मागील वर्षी २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस झाला होता. आणखी मान्सून सक्रिय होण्याचे संकेत प्रसारमाध्यमातून व्यक्त होत आहेत. 

अखंडित वीजपुरवठा द्याधानपीक हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची अवकृपा झाली आहे. पाण्याची सुविधा आहे त्यांची रोवणी झाली. कोरडवाहू क्षेत्रात अद्याप रोवणी झाली नाही. कुणी पाणी विकत घेऊन रोवणी केली; पण त्यानंतर पावसाने डोळे वटारले. वीज पुरवठा केवळ आठ तास होतो. ज्यांच्याकडे पाणी व पंप आहेत ते कसेबसे सावरतील; पण ज्यांनी पंप भाड्याने घेऊन रोवणी केली त्यांची मोठी अडचण आहे. विजेचा आठ तास पुरवठा पुरेसा नाही. ज्यांच्याकडे ही सुविधा आहे तो शेतकरी विजेच्या वेळात स्वतःच्या शेतीला पाणी पुरवठा करेल की भाड्याने मागणाऱ्याला  देईल, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी पीक निघेपर्यंत अखंडित वीजपुरवठा करावा.              - गंगाधर परशुरामकर, प्रगतशील शेतकरी खोडशिवणी

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण