शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

गोंदिया जिल्हा अजूनही तहानलेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. धानपीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते. सिंचन सुविधा व पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी धानपिकाला पोषक अशी पर्जन्यवृष्टी झालीच नाही. बरीचशी रोवणी अद्याप झाली नाही यावरून पावसाची परिस्थिती लक्षात येऊ शकते. 

संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : आगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी अडकली आहे. धरण, तलाव अद्याप भरले नाहीत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. उजाडतो तो दिवस तसाच मावळतो, त्यामुळे शेतकरी चिंतातुर दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. धानपीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते. सिंचन सुविधा व पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी धानपिकाला पोषक अशी पर्जन्यवृष्टी झालीच नाही. बरीचशी रोवणी अद्याप झाली नाही यावरून पावसाची परिस्थिती लक्षात येऊ शकते. ११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ७५४.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ६२२ मिमी पाऊस झाला आहे. १३२.६ मिमी पावसाची तूट आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांची रोवणी झाली खरी, मात्र पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह हे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे मोठे धरण आहे. मात्र, त्यात केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने प्रशासन सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याची जोखीम स्वीकारत नाही. यासाठी कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ६ ऑगस्टपर्यंत इटियाडोह धरणातून पाणी सोडण्यात आले होते. ते बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवू नये हा या मागील हेतू आहे. ओलिताखाली जी शेतजमीन आहे, ते शेतकरी समाधानी आहेत. मात्र, कोरडवाहू क्षेत्रात असमाधान आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

दोन तालुक्यांत दयनीय अवस्था - आमगाव व सडक अर्जुनी तालुक्याची अवस्था दयनीय आहे. या तालुक्यांत तर सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टीचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते. अद्यापतरी हे भाकीत खरे होताना दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षी पर्जन्यवृष्टी सरासरी गाठेल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. धान शेतीला वेळोवेळी पाण्याची गरज असते. अवेळी पाऊस आलेले चालत नाही. यंदा मात्र अजिबात तसे चित्र दिसून येत नाही. मागील वर्षी २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस झाला होता. आणखी मान्सून सक्रिय होण्याचे संकेत प्रसारमाध्यमातून व्यक्त होत आहेत. 

अखंडित वीजपुरवठा द्याधानपीक हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची अवकृपा झाली आहे. पाण्याची सुविधा आहे त्यांची रोवणी झाली. कोरडवाहू क्षेत्रात अद्याप रोवणी झाली नाही. कुणी पाणी विकत घेऊन रोवणी केली; पण त्यानंतर पावसाने डोळे वटारले. वीज पुरवठा केवळ आठ तास होतो. ज्यांच्याकडे पाणी व पंप आहेत ते कसेबसे सावरतील; पण ज्यांनी पंप भाड्याने घेऊन रोवणी केली त्यांची मोठी अडचण आहे. विजेचा आठ तास पुरवठा पुरेसा नाही. ज्यांच्याकडे ही सुविधा आहे तो शेतकरी विजेच्या वेळात स्वतःच्या शेतीला पाणी पुरवठा करेल की भाड्याने मागणाऱ्याला  देईल, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी पीक निघेपर्यंत अखंडित वीजपुरवठा करावा.              - गंगाधर परशुरामकर, प्रगतशील शेतकरी खोडशिवणी

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण