शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेला गोंदिया जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा,नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलाशयांच्या संवर्धनासाठी पर्यावरण, जैवविविधतेसह इतर घटक महत्त्वपूर्ण असतात. मात्र प्रदूषणाचे प्रमाण अधिक असेल तर याचा जलाशयांवर आणि पक्ष्यांच्या स्थलांतरणावर सुध्दा मोठा परिणाम होतो. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचे अनुकुुल परिणाम सुध्दा दिसून आहे. वन्यप्राण्यांचा सुध्दा मुक्त संचार वाढला आहे. गोंदिया जिल्हा जैवविविधतेने नटलेला असल्याने दुर्मिळ समजले जाणारे सारस पक्षी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची होवू लागली आहे. जलाशयांमधील जैवविविधता टिकविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने सन २०१२ पासून धडपड सुरू केली. त्यातून परसवाडा, लोहारा व आमगाव येथील नवतलाव अशी तीन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली आहेत. तर बाजारटोला, झालीया, झिलमीली या तलावांमधील जैवविविधता जोपासून पक्षी आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांचे संवर्धन केले जात आहे. जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा,नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण याचा अभ्यास करुन जलाशय टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यात आला.जैवविविधतेने नटलेला जिल्हातलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात जैवविविधतेने नटलेला आहे. तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये अनेक जैव वनस्पती आहेत. या तलावांमध्ये पक्ष्यांसाठी पोषक असलेलेले खाद्य मिळत असल्याने दरवर्षी लाखो विदेशी पक्षी जिल्ह्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. नवेगावबांध परिसर यासाठी प्रसिध्द आहे.दुर्मिळ समजल्या जाणाºया व प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाºया सारस पक्ष्यांचे सुध्दा या ठिकाणी अधिवास तयार झाले आहे.सर्वाधिक ४४ सारस पक्ष्यांची नोंद ही जिल्ह्यात झाली आहे.जिल्हा जंगल व्याप्त असल्याने या अनेक दुर्मिळ वनस्पती सुध्दा आढळतात. सालेकसा तालुक्यातील मुरकुडोह दंडारी येथील जंगलात दुर्मिळ बांबु असून त्यापासून चांगली बासरी तयार केली जाते.गोंदिया जिल्ह्यात अनेक दुर्मिळ वनस्पती असून जलाशयांचे प्रमाण देखील अधिक आहे.या जलाशयांमध्ये पक्ष्यांसाठी पोषक असलेले खाद्य आणि अनुकुल जैवविविधता असल्याने स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. या जलाशंयामधील वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. चिला, कमळ यासारख्या वनस्पतींचे प्रमाण वाढविल्यास पक्ष्यांना खाद्य मिळण्यास मदत होईल.- मुकुंद धुर्वे , पर्यावरणतज्ज्ञतलावांचे रिस्टोरेशन, व्यवस्थापन व कृती आराखडा आणि अमंलबजावणी करून तीन तलावांचे पुनरूज्जीवन करण्यात आले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामे केली. गावात भिंतीवर चित्र काढून जनजागृती केली. त्यामुळे जिल्ह्यातील तीन जलाशये पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘मॉडेल’ ठरत आहेत.- सावन बहेकार, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य