शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तलावांचा गोंदिया जिल्हा पडतोय कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:20 IST

यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअनेक तलावांनी गाठला तळ पाणी टंचाईचे संकट गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.मागील तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम शेती आणि सिंचन प्रकल्पावर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यात सिंचन योग्य एकूण ६९ प्रकल्प आहे. तर चार प्रकल्प मोठे आहे. यापैकी तीन प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते. मात्र यंदा या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ इटियाडोह जलाशयाचे पाणी २१०० हेक्टरला देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लावगड करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले होते. मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व मालगुजारी तलाव ज्यांचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो अशा तलावांची संख्या ६५ आहे. मात्र सध्या स्थितीत यापैकी १४ तलावात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर चिरचाळबांध व तेढा येथील तलावांनी आताच तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ७.३४ टक्के पाणीसाठा आहे. तर लघु प्रकल्पाच्या भदभदया तलावात ४.४३ टक्के, गुमडोह ३.९६ टक्के, रेहाडी ७.४५, रिसामा ३.१२, सोनेगाव ६.८५, सडेपार ०.३२, सेरपार जलाशयात केवळ ३.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर १० ते २० टक्के पाणीसाठा असलेले १५ जलाशयांचा समावेश आहे. बोदलकसा १७.०३ टक्के, चुलबंद १९.०३, रेेंगेपार १३.६६, आक्टीटोला १६.५३, पांगडी १७.४, राजोली ११.७२, जुनेवानी १९.६५ टक्के, बोपाबोडी १५.०६, काटी १७.३७, कोकणा १५.३८, खाडीपार १४.७८, निमगाव १२.७५, खोेडशिवणी १९.९६, नांदलपार ११.०७, ताडगाव ११.५० टक्के पाणीसाठा आहे.शहराची भिस्त पुजारीटोलावरमहाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरवासीयांना पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. तिच परिस्थिती यंदा असणार असून प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकटजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ६५ तलावात सध्यास्थितीत केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ९ मध्यम प्रकल्पात २८.९३ टक्के, लघु प्रकल्पात २८.६९ टक्के पाणीेसाठा आहे. मामा तलावात ३१ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारी महिन्यातच अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक असणार असल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई