शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचा गोंदिया जिल्हा पडतोय कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:20 IST

यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअनेक तलावांनी गाठला तळ पाणी टंचाईचे संकट गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने परतीच्या कालावधीत पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने तलावांचा जिल्हा कोरडा पडत असल्याचे चित्र आहे.मागील तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम शेती आणि सिंचन प्रकल्पावर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यात सिंचन योग्य एकूण ६९ प्रकल्प आहे. तर चार प्रकल्प मोठे आहे. यापैकी तीन प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते. मात्र यंदा या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ इटियाडोह जलाशयाचे पाणी २१०० हेक्टरला देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लावगड करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले होते. मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व मालगुजारी तलाव ज्यांचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो अशा तलावांची संख्या ६५ आहे. मात्र सध्या स्थितीत यापैकी १४ तलावात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर चिरचाळबांध व तेढा येथील तलावांनी आताच तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ७.३४ टक्के पाणीसाठा आहे. तर लघु प्रकल्पाच्या भदभदया तलावात ४.४३ टक्के, गुमडोह ३.९६ टक्के, रेहाडी ७.४५, रिसामा ३.१२, सोनेगाव ६.८५, सडेपार ०.३२, सेरपार जलाशयात केवळ ३.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर १० ते २० टक्के पाणीसाठा असलेले १५ जलाशयांचा समावेश आहे. बोदलकसा १७.०३ टक्के, चुलबंद १९.०३, रेेंगेपार १३.६६, आक्टीटोला १६.५३, पांगडी १७.४, राजोली ११.७२, जुनेवानी १९.६५ टक्के, बोपाबोडी १५.०६, काटी १७.३७, कोकणा १५.३८, खाडीपार १४.७८, निमगाव १२.७५, खोेडशिवणी १९.९६, नांदलपार ११.०७, ताडगाव ११.५० टक्के पाणीसाठा आहे.शहराची भिस्त पुजारीटोलावरमहाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत शहरवासीयांना पिण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. तिच परिस्थिती यंदा असणार असून प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकटजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ६५ तलावात सध्यास्थितीत केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ९ मध्यम प्रकल्पात २८.९३ टक्के, लघु प्रकल्पात २८.६९ टक्के पाणीेसाठा आहे. मामा तलावात ३१ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारी महिन्यातच अनेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक असणार असल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई