शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

गोंदिया शहराला होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:52 IST

आरोग्य धोक्यात : वारंवार निर्माण होतेय समस्या

लोकमत न्यूज नेटवरगोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर दोन-तीन महिन्यांनी ही समस्या निर्माण होत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले असून, यावर उपाययोजना करण्यात मजीप्राला अद्यापही यश आले नाही.

मजीप्राच्या वतीने शहरात पाणीपुरवठा केला जातो. यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात ४२ वॉर्ड आहेत. तर घरगुती, वाणिज्यिक, संस्था व नगर परिषद असे एकूण २५ हजारांहून अधिक नळकनेक्शनधारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. परंतु, शहरात मागील वर्षीपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नळांना दूषित पाणीपुरवठा होत असतो. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी (पाइप) लिकेज झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. मात्र, यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यापुर्वीसुद्धा तक्रारीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे या भागातील नळकनेक्शनधारकांनी आठवडाभरापूर्वीसुद्धा गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तेव्हा प्राधिकरणाने त्यावर उपाययोजना केली होती. पण, शुक्रवारपासून (दि. १४) या समस्येत पुन्हा वाढ झाल्याने नळकनेक्शनधारक त्रस्त झाले आहेत.

भूमिगत गटार योजनेच्या कामाचा परिणामशहरात भूमिगत गटार योजनेच्या कामांमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. त्यामुळेच शहरात गटार योजनेचे काम सुरू होताच दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असते, असा अनुभव नागरिक घेत आहेत. काही दिवसांपूर्वी चांदणी चौक, गांधी प्रतिमा परिसरात गटार योजनेसाठी खोदकाम करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली.

या भागाला झाला दूषित पाणीपुरवठाशहरातील गणेशनगर, बजरंगनगर, फुलचूर रोड, श्रीनगर, भीमनगर, मरारटोली, सिंधी कॉलनी, माताटोली, गणेशनगर, बजरंगनगर, गांधी वॉर्ड, सिव्हिल लाइन या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईgondiya-acगोंदिया