शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आंतरजातीय विवाह केल्याबद्दल दंड ठोठावणाऱ्यांविरुद्ध गोंदियात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:59 IST

गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

ठळक मुद्देमरार समाजाच्या चौघांवर गुन्हासामाजिक बहिष्काराची दिली होती धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  गोंदिया तालुक्याच्या किन्ही येथील दिगंबर मेतलाल खरे याने याने सन २०११ मध्ये वर्धा जिल्ह्यातील एका दलित समाजाच्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला. तो मुंबईला शिक्षक म्हणून काम करताना मुंबई येथे एका तरूणीच्या संपर्कात आल्यामुळे त्याने आंतरजातीय विवाह केला. ती सुध्दा मुंबईला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या आंतरजातीय विवाहामुळे गावातील मरार समाज सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिगंबरच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. मरार समाज समितीने ६ जून २०११ ला घेतलेल्या बैठकीत खरे कुटुंबियांकडून या आंतरजातीय विवाहाचे दंड म्हणून ६१ हजार रुपये घेण्यात आले. दंड दिल्यानंतर गावातील लोक त्यांच्यासोबत बोलचाल करून लागले. सन २०१७ मध्ये दिगंबरची आजी मरण पावली तिच्या मृत्यूची बातमी खरे कुटुंबियांनी इसुलाल कहनावत याला दिली नाही, म्हणून त्याच्याकडून ११०० रुपये पुन्हा दंड घेण्यात आला. या प्रकाराला कंटाळलेल्या दिगंबरचा भाऊ बुनेंद्रकुमार मेतलाल खरे (२७) याने या संदर्भात रावणवाडी पोलिसात तक्रार केली. खरे कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या नावावर त्यांच्याकडून ६२ हजार १०० रुपये दंड घेणाऱ्या चौघांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सन २०११ मध्ये बुनेंद्रकुमार यांच्या भावाने आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देत दंड म्हणून ६२ हजार १०० रुपए वसूल करणाऱ्या आरोपी फत्तेलाल कहनावत (५८), सुंदरलाल कहनावत (५५), इसूलाल कहनावत व हंसराज खरे सर्व रा. किन्ही यांच्यावर भादंविच्या कलम ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.  उत्पन्नावर ठरते दंडाची रक्कममरार समाज समितीने दंडाच्या नावावर गावातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात वसूल केलेल्या रकमेचा हिशेबच नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. किती लोकांकडून किती दंड वसूल केले याची माहिती देण्यास समिती नाकारत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. समाजाविरूध्द एखाद्याने कृत्य केले त्यावर दंड आकारला जातो. परंतु हा दंड सर्वांना समान न आकारता त्या व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नानुसार दंड आकारत असल्याची माहिती आहे. एका तरूणावर सामाजिक बहिष्कार किन्ही येथील एका मरार समाजाच्या तरूणाने पोवार समाजातील एका तरूणीशी प्रेमविवाह केला त्यामुळे त्या तरूणावरही ३१ हजार रुपए दंड करण्यात आला. परंतु त्या तरूणाची आर्थिक परिसथिती हलाकीची असल्यामुळे त्याच्यावर मागील सहा महिन्यापासून बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती आता  येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तंटामुक्त समिती गप्प का?महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रेमविरांसाठी व आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे चित्र जिकडे-तिकडे उभे आहे. परंतु गोंदिया तालुक्याच्या किन्ही येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रेमवीरांना मदत का केली नाही यावर चर्चा सुरू आहे. गावात सामाजिक सलोखा राखण्याचे काम करणाऱ्या तंटामुक्त गाव समितीने किन्ही गावातील बिघडलेल्या सामाजिक स्वास्थाकडे दुर्लक्ष केले आहे. 

टॅग्स :marriageलग्न