शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भाविकांच्या गर्दीने फुलले कचारगड, पाच दिवस होणार 'जय सेवा'चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 11:26 IST

मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात.

ठळक मुद्देयात्रेला झाली सुरुवात लाखो आदिवासी बांधव लावतात हजेरी

विजय मानकर

गोंदिया : जिल्ह्यातील पूर्व टोकावर असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड देशभरातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून मध्य भारतासह आता देश-विदेशात प्रसिद्धीला आलेला आहे. मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात.

गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील जिल्ह्याच्या परिसरात सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्व भाग पसरलेला आहे. या भागात अनेक ठिकाणी पर्वतांमध्ये गुहा आहेत. काही अभ्यासक या परिसराला मैकल पर्वतरांगेच्या भागसुद्धा मानतात. या भागात सालेकसा तालुक्यातील कचारगड आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असून बाजूला पर्वतातसुद्धा अनेक छोटी-मोठी गुहा पहावयास मिळतात.

या गुहांमध्ये आदिवासींचे पूर्वज अदृश्य रूपात आजही वास्तव्यात आहेत, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी लोह युगात आदिवासी गोंड जमातींचे पूर्वज या गुहेत राहत असून दगडी भांडे आणि कच्च्या लोखंडाच्या साहित्यांचा वापर करीत असत. असे या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून अंदाज लावला जातो. क्षेत्रात अनेक नदी-नाले आहेत. आदिवासी समाज समृूहाने वावरत जंगलातील फळ, फुले कंदमुळे आणि प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह आणि गुहांमध्ये वास्तव्य करीत असत. हळूहळू आदिवासींची संख्या वाढत गेली आणि नंतर या ठिकाणातून आदिवासी लोक इतर भागात वास्तव्य करू लागले.

अशी आहे श्रद्धा

आदिवासी गोंड समाजाच्या धार्मिक मान्यतेनुसार माता गौराचे ३३ मानसपुत्र होते. ते मोठे उपद्रवी होते. त्यांचा उपद्रव बघून त्यांना या मोठे गुहेत डांबून दारावर मोठे दगड बंद करण्यात आले होते. आदिवासी संगीतकाराने आपले किंदरी वाद्य वाजविले. त्यामुळे त्या ३३ भावंडामध्ये उत्साह संचारला आणि दारावरील दगडाला धक्का दिला. ते गुहेतून मुक्त होऊन येथून पसार झाले. वेगवेगळ्या ठिकाणी वंशवाढ करू लागले. संगीतकारचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी त्यांचे पूर्वज मात्र कचारगड येथील असून त्यांची आत्मा अदृश्य स्वरूपात येथे असल्याची श्रध्दा आहे. त्यामुळेच आदिवासी समाजबांधव माद्य पोर्णिमेला येथे येऊन आपल्या दैवतांचे पूजन आणि पूर्वजांचे स्मरण करतात.

अशी झाली यात्रेला सुरुवात

कचारगडला जगप्रसिद्ध करण्यासाठी गोंडी संशोधक मोतीरावण कंगाले, सुन्हेरसिंह ताराम, के.बी मर्सकोल्हे, शीतल मरकाम व बी.एल कोर्राम यांनी सन १९८६ पासून धनेगाव येथून कचारगड यात्रेची सुरुवात केली. त्यावेळच्या आदिवासी विकास मंत्र्यांना पाचारण करून धनेगाव येथे गोंडीध्वज फडकावून यात्रा सुरू केली. 

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थानSocialसामाजिकcultureसांस्कृतिकVidarbhaविदर्भ