शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

भाविकांच्या गर्दीने फुलले कचारगड, पाच दिवस होणार 'जय सेवा'चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 11:26 IST

मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात.

ठळक मुद्देयात्रेला झाली सुरुवात लाखो आदिवासी बांधव लावतात हजेरी

विजय मानकर

गोंदिया : जिल्ह्यातील पूर्व टोकावर असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड देशभरातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून मध्य भारतासह आता देश-विदेशात प्रसिद्धीला आलेला आहे. मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात.

गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील जिल्ह्याच्या परिसरात सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्व भाग पसरलेला आहे. या भागात अनेक ठिकाणी पर्वतांमध्ये गुहा आहेत. काही अभ्यासक या परिसराला मैकल पर्वतरांगेच्या भागसुद्धा मानतात. या भागात सालेकसा तालुक्यातील कचारगड आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असून बाजूला पर्वतातसुद्धा अनेक छोटी-मोठी गुहा पहावयास मिळतात.

या गुहांमध्ये आदिवासींचे पूर्वज अदृश्य रूपात आजही वास्तव्यात आहेत, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी लोह युगात आदिवासी गोंड जमातींचे पूर्वज या गुहेत राहत असून दगडी भांडे आणि कच्च्या लोखंडाच्या साहित्यांचा वापर करीत असत. असे या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून अंदाज लावला जातो. क्षेत्रात अनेक नदी-नाले आहेत. आदिवासी समाज समृूहाने वावरत जंगलातील फळ, फुले कंदमुळे आणि प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह आणि गुहांमध्ये वास्तव्य करीत असत. हळूहळू आदिवासींची संख्या वाढत गेली आणि नंतर या ठिकाणातून आदिवासी लोक इतर भागात वास्तव्य करू लागले.

अशी आहे श्रद्धा

आदिवासी गोंड समाजाच्या धार्मिक मान्यतेनुसार माता गौराचे ३३ मानसपुत्र होते. ते मोठे उपद्रवी होते. त्यांचा उपद्रव बघून त्यांना या मोठे गुहेत डांबून दारावर मोठे दगड बंद करण्यात आले होते. आदिवासी संगीतकाराने आपले किंदरी वाद्य वाजविले. त्यामुळे त्या ३३ भावंडामध्ये उत्साह संचारला आणि दारावरील दगडाला धक्का दिला. ते गुहेतून मुक्त होऊन येथून पसार झाले. वेगवेगळ्या ठिकाणी वंशवाढ करू लागले. संगीतकारचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी त्यांचे पूर्वज मात्र कचारगड येथील असून त्यांची आत्मा अदृश्य स्वरूपात येथे असल्याची श्रध्दा आहे. त्यामुळेच आदिवासी समाजबांधव माद्य पोर्णिमेला येथे येऊन आपल्या दैवतांचे पूजन आणि पूर्वजांचे स्मरण करतात.

अशी झाली यात्रेला सुरुवात

कचारगडला जगप्रसिद्ध करण्यासाठी गोंडी संशोधक मोतीरावण कंगाले, सुन्हेरसिंह ताराम, के.बी मर्सकोल्हे, शीतल मरकाम व बी.एल कोर्राम यांनी सन १९८६ पासून धनेगाव येथून कचारगड यात्रेची सुरुवात केली. त्यावेळच्या आदिवासी विकास मंत्र्यांना पाचारण करून धनेगाव येथे गोंडीध्वज फडकावून यात्रा सुरू केली. 

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थानSocialसामाजिकcultureसांस्कृतिकVidarbhaविदर्भ