शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

मजुरांना रोहयोची कामे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:32 AM

मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : विविध यंत्रणांना समन्वय साधण्याचा दिला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.२३) रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आर. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजना ही आपल्या राज्याची योजना आहे. मात्र आज आपण या योजनेच्या अंमलबजावणीत माघारलो आहे. तालुका पातळीवर संबंधित यंत्रणांचा या योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका आहे. तालुका पातळीवर तहसीलदाराने यंत्रणांचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी. योजनेच्या कामाचा नियमित आढावा दर महिन्याला घ्यावा. ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना कामे उपलब्ध करु न द्यावे. ग्रामपंचायती व ग्रामस्थांना विश्वासात घेवून रोहयोतून विकास कामे करावी. ज्या मजुरांना मागील कामांची अद्यापर्यंत मंजुरी देण्यात आली नाही, त्यांना ती त्वरित देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. कुशलच्या कामाची थकीत मंजुरी केंद्र सरकारकडून लवकर उपलब्ध कशी होईल, यासाठी देखील पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. पांदण रस्ते शेतकºयांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जिल्ह्यात रोहयोमधून मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते तयार करण्याचे नियोजन करावे. अनेक गावात अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी पंचायत समित्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले. सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, सहायक वनसंरक्षक शेंडे, शेख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व रोहयोचे अधिकारी उपस्थित होते.१३ हजार मजुरांची मजुरी प्रलंबितजिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. निधी उपलब्ध नसला तरी मजूर मोठ्या संख्येने कामावर येत आहे. जिल्ह्यातील ज्या १३ हजार मजुरांची मजुरी प्रलंबित आहे, निधी उपलब्ध होताच ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या कुटुंबांनी ९० दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे, अशा कुटुंबातील मजुरांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. जिल्ह्यात २२ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर ८६४ कामे व यंत्रणांची ३९१ कामे अशी एकूण १२५५ कामे सुरु आहेत. यावर ६८ हजार ५२९ मजूर कामावर आहेत.