शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
3
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
4
४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं म्हणत विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
5
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
6
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
7
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
8
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
9
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
10
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
11
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
12
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
13
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
14
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
15
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
16
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
17
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
18
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
19
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  

गरीब विद्यार्थ्यांना इंटरनेट व स्मार्टफोन मोफत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:00 AM

अनेक कुटुंब वीज बिल भरू न शकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्रामीण दुर्गम भाग शासनाच्या प्राधान्यक्रमात नसल्याने राज्यातील हजारो गाव-पाड्यांत आजही मोबाईल नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन यासारखी आधुनिक साधने कुठून येणार? असा सवाल अतुल सतदेवे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसंविधान मैत्री संघाची मागणी : ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाने मोफत मोबाईल आणि इंटरनेट सेवा देण्याची मागणी संविधान मैत्री संघ व सोबती संघटना आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्र, समता सैनिक दल व सर्वसमाज जयंती समिती यांनी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या नावाने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सरकारचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्र म सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास शहरी, ग्रामीण व आदिवासी भागातील गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी राज्यातील शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था मार्च महिन्यापासून बंद आहेत. मात्र, आता वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सुरु करण्याच्या तयारीत आहे. मात्र, सद्यपरिस्थितीचा विचार करता टाळेबंदीमुळे गरिबांच्या हाताला काम नाही. आर्थिक चक्र पूर्णपणे थांबलेले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब वीज बिल भरू न शकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्रामीण दुर्गम भाग शासनाच्या प्राधान्यक्रमात नसल्याने राज्यातील हजारो गाव-पाड्यांत आजही मोबाईल नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन यासारखी आधुनिक साधने कुठून येणार? असा सवाल अतुल सतदेवे यांनी उपस्थित केला आहे.ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागात वीज जोडणी करुन नियमित वीज पुरवठा करावा, प्रत्येक गाव-पाड्यांत मोबाईल नेटवर्क व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड मोबाईल द्यावेत.यासाठी लागणारा इंटरनेटचा पुरेसा डेटा मोफत उपलब्ध करून द्यावा. ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबविण्यापूर्वी सर्व शिक्षकांना त्याबाबतचे तांत्रिक शिक्षण द्यावे. जेणे करून विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षित करू शकतील आदी मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळात सतदेवे, आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्रतर्फे संचालक महेंद्र कठाने व विद्यार्थी सीमॉन भालाधरे, यश देशभ्रतार, श्रावणी पानतावने, आदित्य कठाने, नंदिनी बन्सोड, सर्वसमाज जयंती समितीचे पुरुषोत्तम मोदी व समता सैनिक दलतर्फे राजहंस चौरे यांचा समावेश होता.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण