शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकरी १० हजार नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: July 15, 2016 02:07 IST

रोहणी नक्षत्राची चाहुल लागताच शेतकरी भर उन्हात शेतामध्ये खरीप पिकाच्या लागवडीसाठी दिवसरात्र काम करतो.

कारवाईची मागणी : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड सुकडी-डाकराम : रोहणी नक्षत्राची चाहुल लागताच शेतकरी भर उन्हात शेतामध्ये खरीप पिकाच्या लागवडीसाठी दिवसरात्र काम करतो. पोटाला चिमटा देऊन शेतामध्ये नवनधीन धानाचे पीक घ्यावे म्हणून बाजारामध्ये येणाऱ्या बियाण्यांच्या खरेदीसाठी तळमळ करतो. मात्र महागडी बियाणे खरेदी करूनही काहीच लाभ पदरी पडत नसेल तर त्या शेतकऱ्यांची काय करावे. त्यासाठी बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भाच्या पूर्व दिशेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व पूर्व नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त खपाचे बियाणे यशोदा कंपनीचे आहेत. ही नावाजलेली धान बियाणे कंपनी आहे. या कंपनीचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. पण यावर्षी जयश्रीराम, आरपीएन व इतर तसेच आता पद्याशाली ही बियाणे खरेदी करून पेरण्यात आले. पण ते उगवलेच नाही. यशोदा कंपनीने यावर्षी बोगस बियाणे देवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली. यशोदा कंपनीची मान्यता रद्द करण्यात यावी. घेतलेल्या बियाण्यांवर १० किलोप्रमाणे पाच हजार रूपये व एक एकरी बियाण्यांवर १० हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभुळकर यांनी केली आहे. तिरोडा तालुक्यामध्ये अनेक कृषी केंद्र आहेत. या केंद्रांवरून सर्वच गावातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. यंदा पाऊस लांबले, तरीही शेतकऱ्यांनी धान बियाणे शेतामध्ये पेरले. पण ते काही प्रमाणात उगवले व काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही उगवलेच नाही. अशावेळी शेतकरी आज नाही तर उद्या धान उगवेल, अशा भोळ्या आशेत होते. पण एक आठवडा झाला व एक महिना लोटल्यानंतर यशोदा कंपनीचे धान उगवलेच नाही. सुकडी-डाकराम परिसरामध्ये डोंगरगाव, खडकी, बुचाटोला, बोदलकसा, रूस्तमपूर, सुकडी-डाकराम, ठाणेगाव, मेंढा, बेरडीपार, खुर्शीपार, रावणघाटा, मलपुरी, मंगेझरी, गोविंदपूर, कोडोबर्रा, इंदोरा, निमगाव, चिखली, खमारी, गराडा, मलपुरी अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यशोदा कंपनीची बियाणे उगवलेच नाही. जयश्रीराम, आरपीएन आता पद्माशाली धानही उगवले नाही. बुचाटोला येथील शेतकरी धर्मदास जांभुळकर यांनी तिरोडा येथील कृषी केंद्रामधून पद्माशाली (सुगधतारा) धान बियाणे खरेदी केले. शेतामध्ये १० किलोच्या तीन बॅग म्हणजे ३० किलो शेतामध्ये पेरले. हे धान केवळ २५ टक्के उगवले आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्याने तिरोडा येथील कृषी केंद्रावर जावून माहिती दिली. तसेच दुसऱ्या बियाण्यांची मागणी केली. पण कृषी केंद्रसंचालकांनी दुसरे बियाणे देता येत नाही, असे सांगितले.