शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकरी १० हजार नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: July 15, 2016 02:07 IST

रोहणी नक्षत्राची चाहुल लागताच शेतकरी भर उन्हात शेतामध्ये खरीप पिकाच्या लागवडीसाठी दिवसरात्र काम करतो.

कारवाईची मागणी : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड सुकडी-डाकराम : रोहणी नक्षत्राची चाहुल लागताच शेतकरी भर उन्हात शेतामध्ये खरीप पिकाच्या लागवडीसाठी दिवसरात्र काम करतो. पोटाला चिमटा देऊन शेतामध्ये नवनधीन धानाचे पीक घ्यावे म्हणून बाजारामध्ये येणाऱ्या बियाण्यांच्या खरेदीसाठी तळमळ करतो. मात्र महागडी बियाणे खरेदी करूनही काहीच लाभ पदरी पडत नसेल तर त्या शेतकऱ्यांची काय करावे. त्यासाठी बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भाच्या पूर्व दिशेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व पूर्व नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त खपाचे बियाणे यशोदा कंपनीचे आहेत. ही नावाजलेली धान बियाणे कंपनी आहे. या कंपनीचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. पण यावर्षी जयश्रीराम, आरपीएन व इतर तसेच आता पद्याशाली ही बियाणे खरेदी करून पेरण्यात आले. पण ते उगवलेच नाही. यशोदा कंपनीने यावर्षी बोगस बियाणे देवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली. यशोदा कंपनीची मान्यता रद्द करण्यात यावी. घेतलेल्या बियाण्यांवर १० किलोप्रमाणे पाच हजार रूपये व एक एकरी बियाण्यांवर १० हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभुळकर यांनी केली आहे. तिरोडा तालुक्यामध्ये अनेक कृषी केंद्र आहेत. या केंद्रांवरून सर्वच गावातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. यंदा पाऊस लांबले, तरीही शेतकऱ्यांनी धान बियाणे शेतामध्ये पेरले. पण ते काही प्रमाणात उगवले व काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही उगवलेच नाही. अशावेळी शेतकरी आज नाही तर उद्या धान उगवेल, अशा भोळ्या आशेत होते. पण एक आठवडा झाला व एक महिना लोटल्यानंतर यशोदा कंपनीचे धान उगवलेच नाही. सुकडी-डाकराम परिसरामध्ये डोंगरगाव, खडकी, बुचाटोला, बोदलकसा, रूस्तमपूर, सुकडी-डाकराम, ठाणेगाव, मेंढा, बेरडीपार, खुर्शीपार, रावणघाटा, मलपुरी, मंगेझरी, गोविंदपूर, कोडोबर्रा, इंदोरा, निमगाव, चिखली, खमारी, गराडा, मलपुरी अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यशोदा कंपनीची बियाणे उगवलेच नाही. जयश्रीराम, आरपीएन आता पद्माशाली धानही उगवले नाही. बुचाटोला येथील शेतकरी धर्मदास जांभुळकर यांनी तिरोडा येथील कृषी केंद्रामधून पद्माशाली (सुगधतारा) धान बियाणे खरेदी केले. शेतामध्ये १० किलोच्या तीन बॅग म्हणजे ३० किलो शेतामध्ये पेरले. हे धान केवळ २५ टक्के उगवले आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्याने तिरोडा येथील कृषी केंद्रावर जावून माहिती दिली. तसेच दुसऱ्या बियाण्यांची मागणी केली. पण कृषी केंद्रसंचालकांनी दुसरे बियाणे देता येत नाही, असे सांगितले.