शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

धान उत्पादकांना बोनस द्या

By admin | Updated: February 3, 2015 22:58 IST

तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी मोर्चा काढून निवेदने दिली.

गोरेगाव / सालेकसा : तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी मोर्चा काढून निवेदने दिली.केंद्र व राज्यातील भाजपाप्रणित सरकारच्या निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे, असा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला.गोरेगावच्या ठाणा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग बघेले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, जिल्हा महासचिव जगदिश येरोला, पी.जी. कटरे, तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, राजेंद्र राठौड, जितेंद्र कटरे, शशीकांत भगत, मलेशाम येरोला, अरविंद फाये, ओमप्रकाश कटरे, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष ललिता फुंडे, सरपंच संजय आमदे, रामू हरिणखेडे, सी.टी. चौधरी, पेमेंद्र कटरे, विशाल शेंडे, विवेक मेंढे, संजय भगत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी, बेरोजगार युवक व शेतमजूर प्रामुख्याने उपस्थित होते.मोर्चा तहसील कार्यालयात येऊन मान्यवरांनी भाजपा सरकारच्या आश्वासनांची व जनतेची फसवणूक करण्यात आली, हे आम्ही खपवून घेणार नाही, अशा घोषणा देत तहसीलदारांना कमिटीच्या वतीने आपल्या २० मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सालेकसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, पुरूष, मजूर वर्ग हजारोच्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. त्यामुळे तहसील कार्यालयाचे संपूर्ण परिसर दणाणले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, सचिव यादवलाल बनोठे, तालुकाध्यक्ष अनिल फुंडे यांच्या नेतृत्वात माजी मंत्री भरत बहेकार यांच्या निवासस्थानावरून मोर्च्याची सुरूवात झाली. त्यानंतर बस स्थानक, पंचायत समिती चौक, को-आॅपरेटिव्ह बँक चौक, फॉरेस्ट आॅफीस समोरून सरळ तहसील कार्यालयाच्या विशाल प्रांगणात धडकला. मोर्च्यात सर्व शेतकरी, महिला व पुरूष पायी चालत गेले. तसेच ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनी आपापल्या ट्रॅक्टरव्दारे काँग्रेसचे झेंडे घेवून ट्रॅक्टरसह मोर्च्यात सहभागी झाले. मागण्यांमध्ये प्रामुख्याने धानाला ५०० रूपये बोनस, वीज बिल माफ करणे, नवीन डिमांड दर कमी करणे, मनरेगाची कामे त्वरित सुरू करणे, शेती कामे मनरेगा अंतर्गत करावे, अन्न सुरक्षा कायदा अंमलात आणावे, गॅस पुरवठा धोरण पूर्ववत करावे, केरोसिन पुरवठा कायम ठेवावे, कृषी उत्पादनाच्या हमी भावात वाढ करणे, खताच्या किमती कमी करावे, शासनाने केलेल्या घोषणा प्रामाणिकपणे पूर्ण करावे, कर्ज वसुली मोहीम थांबविणे, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावे, बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्च्यात कैलाश अग्रवाल, सचिन बहेकार, मुन्ना शर्मा, देवचंद ढेकवार, मयाराम फुंडे, खेमराज साखरे व अनेक कार्यकर्ते सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)