शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:16 IST

वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, ....

ठळक मुद्देसीमा मडावी यांचे आवाहन : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी यांनी केले.येथील स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, गोंदिया पंचायत समितीच्या सभापती माधुरी हरिणखेडे, सालेकसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ए.के.मडावी, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, राजेश राठोड, डॉ. शाम निमगडे, राजेश वासनिक, आर.एस.वैराडकर, संजय विश्वकर्मा उपस्थित होते.प्रत्येक व्यक्तीने श्रमदान करण्याची गरज व्यक्त करुन मुकाअ दयानिधी यांनी वर्तणुकीतील बदलावर भर दिला. ते म्हणाले, कोणतेही खाद्य पदार्थ घेतल्यास त्यातील टाकाऊ कचरा आपण उघड्यावरच फेकतो. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणात अशाप्रकारे कचरा टाकून आपण आपलाच परिसर अस्वच्छ करतो. ही प्रवृत्ती बदलविणे आता गरजेचे असून, कचरा योग्य ठिकाणात टाकण्याची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी केले.जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या गुडमार्निग पथक उपक्रमाचे कौतुक करुन स्वच्छता ही सेवा या उपक्रमात ग्रामपंचायतीनी उत्कृष्ट कार्य करुन आपले गाव स्वच्छ करण्याचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या प्लायरचे विमोचन तथा पाणी व स्वच्छतेच्या बसस्थानक उद्घोषणचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले गाव व परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये तर आभार शालेय स्वच्छतातज्ज्ञ भागचंद रहांगडाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी सूर्यकांत रहमतकर, राजेश उखळकर, पाणी गुणवत्तातज्ञ मुकेश त्रिपाठी, दिशा मेश्राम, जितेंद्र येरपुडे, बालकिशोर पटले, विशाल मेश्राम, देवानंद बोपचे, शोभा फटींग, छाया सहारे, रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले.जि.प.मध्ये स्वच्छता उपक्रम सोमवारी‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.१७) सकाळी ७ ते ८.३० दरम्यान जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात दोन तास श्रमदान करुन स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानzpजिल्हा परिषद