शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

जनतेच्या समस्या त्वरित मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ ...

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ करण्यात यावी. पी.एम.सी बँकेच्या दिवाळखोरीमुळे काही गुंतवणुकदारांचा जीव गेला असून पैशाअभावी अनेकांच्या घरातील लग्नासाठी साठवलेली रक्कम निवृत्तीची रक्कम संकटात सापडलेली आहे. जनतेच्या अनेक समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी दिलेल्या निवेदनातून सन २०१२ पासून नेहमीच‘अ’ वर्ग पत नामांकन मिळालेली बँक एकदम दिवाळखोरीत कशी गेली. या बँकेत सुमारे ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे अंदाज आहे. याप्रकरणी तातडीने पाऊले उचलून गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई द्यावी, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभर आर्थिक मंदिचे वातावरण निर्माण झाले आहे.आर्थिक मंदिमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर, समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि दारिद्र रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रावर सुमारे ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. कर्ज काढून सरकारचा गाडा चालविण्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर आली आहे. बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. देशातील मंदीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम उद्योग क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रावर देखील झाला असून युती सरकार सत्तेवर आल्यापासून सन २०१४ ते मार्च २०१९ या ५ वर्षात राज्यात १४६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्व परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, डॉ.योगेंद्र भगत, अ‍ॅड. के.आर.शेंडे, पी.पी.कटरे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, जहीर अहमद, पन्नालाल सहारे, उषा मेंढे, उषा शहारे, जि.प.सभापती लता दोनोडे, हेमेंद्र रहांगडाले, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, दीपक पवार, गिरीश पालीवाल, जितेंद्र कटरे, राधेलाल पटले, विजय टेकाम, विनोद लिल्हारे, ज्योती वालदे, माधुरी कुंभरे, सरीता कापगते, प्रभादेवी उपराडे, ममता पाऊलझगडे, परवेज बेग, नटवरलाल गांधी, डॉ.नामदेव किरसान, हेमेंद्र रहांगडाले, शैलेष जायस्वाल, अनिलकुमार गौतम, महेश उके उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी