शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

विविध मुद्यांवर गाजली जि.प.ची सर्वसाधारण सभा

By admin | Updated: August 13, 2014 23:57 IST

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी जि.प. सभागृहात पार पडली. यावेळी क्षयरोग नियंत्रण सोसायटीअंतर्गत भरण्यात येणाऱ्या पर्यवेक्षक व तंत्रसहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेसह

गोंदिया : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी जि.प. सभागृहात पार पडली. यावेळी क्षयरोग नियंत्रण सोसायटीअंतर्गत भरण्यात येणाऱ्या पर्यवेक्षक व तंत्रसहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेसह इतर अनेक मुद््यांवर काही सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.स्वत:च्या स्वार्थाकरिता स्थानिक जि.प. सदस्यांना डावलून गोंदिया पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनावश्यक वापर करणे, हिवताप व डेंग्युवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरलेला आरोग्य विभाग, कृषी विभागांतर्गत अवाजवी दराने धान बियाण्यांची विक्री करणे, आठवीच्या विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी शिक्षक नसणे अशा अनेक मुद्यांवर जिल्हा परिषद सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे, सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मोरेश्वर कटरे उपस्थित होते. दुपारी १ वाजता सुरू झालेल्या सभेत जि.प. सदस्य उमाकांत ढेगे यांनी क्षयरोग नियंत्रण सोसायटीची पदभरती रेंगाळल्याने सीईओ शिंदे यांच्यावर खापत फोडले. सोसायटीव्दारे १९ नोव्हेंबर २०१३ ला चार पर्यवेक्षक व तीन तंत्रसाहाय्यकाच्या पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या अंतर्गत १ हजार १४ बेरोजगारांचे अर्ज प्राप्त झाले. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने पदभरतीची प्रक्रिया लांबली. सीईओंनी या भरतीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे असल्याचे आश्वासन दिले. जि.प. सदस्य विनोद अग्रवाल यांनी शिक्षण विभागाच्या पदोन्नती कार्यशाळा वारंवार रद्द होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असून सहाय्यक शिक्षकांची पदोन्नती करणे हे शासनाचे धोरण आहे. मात्र, कार्यशाळा रेंगाळल्याने त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. गोरेगाव पं.स.च्या सभापती चित्रलेखा चौधरी यांनी त्यांच्याकरिता वाहन उपलब्ध नसल्याने अनेक कामे होत नसल्याचे सांगितले. यामुळे त्वरित वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर यांनी गोंदिया पंचायत समितींतर्गत महिला व बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक महिला मेळावे घेतले जात आहेत. मात्र, या मेळाव्यात जि.प. सदस्यांना वगळण्यात येत असून एका विशिष्ट व्यक्तीकडून हे सर्व कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये येणारा खर्च शासनाच्या तिजोरीतून झाला व मेळाव्याच्या नियोजनात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे शासकीय निधीचा वापर करून स्थानिक लोकप्रतिनिधी जि.प. सदस्यांना वगळत असून अशा चुकीच्या प्रकारांना आळ घालण्यात यावा, अशी मागणी केली. यावर अध्यक्षांनी चौकशी करून अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जि.प. सदस्य राजेश चांदेवार यांनी आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी हिवताप विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्यवस्थित फवारणी केली नाही. त्यामुळेच अनेकांना हिवताप व डेंग्युची लागण झाली असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हिवताप फवारणीचे पावडर भेसळयुक्त असून त्यांच्या चौकशीची मागणी केली. तसेच शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनेक शाळेत आठवीचे वर्ग सुरू केले. मात्र, त्यांना शिकविण्याकरिता शिक्षक नसल्याने ५ वी ते ७ वीचे शिक्षक त्यांना शिकवित आहेत. त्यामुळे विद्यार्थी कसे घडतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी चूक मान्य करीत लवकरच शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले. जि.प. सदस्य मिलन राऊत यांनी बाजारात ६५० रुपयाला मिळणाऱ्या धान बियाण्याची बॅग जि.प.च्या कृषी विभागाच्या माध्यमातून ८४० ला खरेदी केली असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. यावर कृषी सभापती कटरे यांनी, असा कुठलाच प्रकार झाला नसून त्या बॅगची एमआरपी ९५० असल्याचे सांगितले. उमाकांत ढेंगे यांनी मानव विकासअंतर्गत ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थीनीसाठी सुरू असलेल्या सायकल वाटपासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सर्व खासगी शाळांमध्ये सायकल वाटप करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषदेच्या बोंडगावदेवी व अर्जुनी/मोरगाव शाळेला का वगळण्यात आले, याची विचारणा केली. यासह अनेक मुद्यांवर याप्रसंगी चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)