शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

गावरान आमराईचा गोडवा ओसंडला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत ...

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत असत, बागडत असत, दिवसभर वेळ घालवून मनसोक्त असायचे, मन मोहरून जाई, पण आता हा आमराईचा गोडवा राहिलाच नाही, असे चित्र ग्रामीण भागातील आमराई बागेचे दिसत आहे. त्या गोडव्याच्या फक्त आठवणीच राहिल्या, सारी अमराई ओसंडून गेली आहे.

परिसरात अनेक गावाला लागून आमराई आहेत, या आमराई अख्खा उन्हाळा घालवत असत, आमराईमध्ये स्वदेशी खेळ आट्यापाट्या, लंगडी, फुगडी, डब्बा ड, मामाचे पत्र हरवले ते मला सापडले, नाक चिकली, बेंडवा, चंगाअष्टा, गाण्याच्या भेंड्या, नवरीनवरदेव, असे खेळ खेळण्याच्या निमित्ताने घरून मुले-मुली पाण्याच्या बाॅटल घेऊन आमराई दाखल होत.

लागलीच आमराई ही एका सरळ रेषेत आंब्याची झाडे लावली जात असत. या आमराई ह्या गावातील गर्भश्रीमंत व सावकारांच्या मालकीच्या आहेत आणि आमराई रचना ही मनाला स्पर्शून जाणारी असायची, काय तो दुपारचा देखावा, किरकिरीचा सुमधुर संगीत, कडक उन्हाच्या मध्यस्थी आब्यांची गर्द भरलेली घनदाट सावली असायची, असे वाटायचे ‘हे विश्वची माझे घर’... लागूनच तळे, बोळीची पार, त्या पारीवर मोहरलेले चिचेंचे झाड आहेत, नकळत पोरांचा मोर्चा हा चिचेंच्या झाडाकडे वळून चिंचेचे आस्वाद घेत असत, चिंचांपासून अनेक रुचकर पदार्थ तयार करून खायची. एक वेगळीच गंमत असायची, ही मजा औरच आहे. आंब्याच्या आमराईत आजही भर दुपारी मन एकदम प्रसन्न होतो. आंबा हा फळांचा राजा आहे, अनेक मानवी, पशुपक्षी प्राणिमात्रांच्या मनावर आजही राज्य करत आहे. आंबा म्हटले की, तोंडाला पाणी येतोच हे नाकारता येत नाही. कलमी, नीलम, डागील, सेंदरी, तांबूस, कोयार, बुडगा, चिप अशा प्रकारचे आंबे आजही गावरान आमराईत आहेत.

.......

आंब्याची नवलाई .....

आंब्यापासून अनेक पदार्थ तयार करतात, लोनचे, कैरी, पन्हा, खुला, आंबट भुरका, आमरस असे करीत असतात, तसेच आंब्याच्या गुहीचा पण उपयोग होतो, गुहीपासून नवीन रोपटे होतात, तर गुह्या वाळवून ठेवले की, त्यांना विकता येते, असा छोटासा व्यवसाय पण करता येतो. आज जर पाहिले, तर आंबा हा महागला आहे, दिवसेंदिवस गावरान आंबाचे उत्पादन कमी होत आहे, कारण वादळवारा येतो. माकडे नासधूस करतात, अशामुळे आंब्याचा बहार हा फार काळ टिकत नाही आणि याचा उत्पादनावर परिणाम पडत असतो. अशा अनेक आठवणींच्या मोहात गावरान आमराई ओसांडली आहे, त्या आमराईच्या आठवणी आजही मनाला ताजेतवाने करतात, आठवणीने मन रमून जाते, पण असेच जगावे लागते आठवणींच्या साहाय्याने, याची साक्ष आजही गावरान आमराई देत आहे.