शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गावरान आमराईचा गोडवा ओसंडला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत ...

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत असत, बागडत असत, दिवसभर वेळ घालवून मनसोक्त असायचे, मन मोहरून जाई, पण आता हा आमराईचा गोडवा राहिलाच नाही, असे चित्र ग्रामीण भागातील आमराई बागेचे दिसत आहे. त्या गोडव्याच्या फक्त आठवणीच राहिल्या, सारी अमराई ओसंडून गेली आहे.

परिसरात अनेक गावाला लागून आमराई आहेत, या आमराई अख्खा उन्हाळा घालवत असत, आमराईमध्ये स्वदेशी खेळ आट्यापाट्या, लंगडी, फुगडी, डब्बा ड, मामाचे पत्र हरवले ते मला सापडले, नाक चिकली, बेंडवा, चंगाअष्टा, गाण्याच्या भेंड्या, नवरीनवरदेव, असे खेळ खेळण्याच्या निमित्ताने घरून मुले-मुली पाण्याच्या बाॅटल घेऊन आमराई दाखल होत.

लागलीच आमराई ही एका सरळ रेषेत आंब्याची झाडे लावली जात असत. या आमराई ह्या गावातील गर्भश्रीमंत व सावकारांच्या मालकीच्या आहेत आणि आमराई रचना ही मनाला स्पर्शून जाणारी असायची, काय तो दुपारचा देखावा, किरकिरीचा सुमधुर संगीत, कडक उन्हाच्या मध्यस्थी आब्यांची गर्द भरलेली घनदाट सावली असायची, असे वाटायचे ‘हे विश्वची माझे घर’... लागूनच तळे, बोळीची पार, त्या पारीवर मोहरलेले चिचेंचे झाड आहेत, नकळत पोरांचा मोर्चा हा चिचेंच्या झाडाकडे वळून चिंचेचे आस्वाद घेत असत, चिंचांपासून अनेक रुचकर पदार्थ तयार करून खायची. एक वेगळीच गंमत असायची, ही मजा औरच आहे. आंब्याच्या आमराईत आजही भर दुपारी मन एकदम प्रसन्न होतो. आंबा हा फळांचा राजा आहे, अनेक मानवी, पशुपक्षी प्राणिमात्रांच्या मनावर आजही राज्य करत आहे. आंबा म्हटले की, तोंडाला पाणी येतोच हे नाकारता येत नाही. कलमी, नीलम, डागील, सेंदरी, तांबूस, कोयार, बुडगा, चिप अशा प्रकारचे आंबे आजही गावरान आमराईत आहेत.

.......

आंब्याची नवलाई .....

आंब्यापासून अनेक पदार्थ तयार करतात, लोनचे, कैरी, पन्हा, खुला, आंबट भुरका, आमरस असे करीत असतात, तसेच आंब्याच्या गुहीचा पण उपयोग होतो, गुहीपासून नवीन रोपटे होतात, तर गुह्या वाळवून ठेवले की, त्यांना विकता येते, असा छोटासा व्यवसाय पण करता येतो. आज जर पाहिले, तर आंबा हा महागला आहे, दिवसेंदिवस गावरान आंबाचे उत्पादन कमी होत आहे, कारण वादळवारा येतो. माकडे नासधूस करतात, अशामुळे आंब्याचा बहार हा फार काळ टिकत नाही आणि याचा उत्पादनावर परिणाम पडत असतो. अशा अनेक आठवणींच्या मोहात गावरान आमराई ओसांडली आहे, त्या आमराईच्या आठवणी आजही मनाला ताजेतवाने करतात, आठवणीने मन रमून जाते, पण असेच जगावे लागते आठवणींच्या साहाय्याने, याची साक्ष आजही गावरान आमराई देत आहे.