शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

भाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 19:59 IST

शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन : राजलक्ष्मी चौकात निदर्शने

आॅनलाईन लोकमतगोंदिया: शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून सांप्रदायिक उन्माद निर्माण करणे, जातीधर्माचे सामंजस्य, सद्भाव व राष्टÑीय एकात्मतेला धोका, जातीय व धार्मिक दंगली घडवून आणण्याची संधी, (फासिस्ट) विचारसरणी पसरवून व्ही.आय. लेनिन, रामास्वामी पेरीयार, डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांचा या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व प्रकणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.निवेदनानुसार, भाजपा सरकारने निवडणुकीच्या वेळी जी आश्वासने दिली ते पूर्ण करण्यात हे सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे. सीमा प्रश्न, काश्मीर समस्या, काळेधन व भ्रष्टाचार, बँक घोटाळे, दरवर्षी २ कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, महागाई कमी करणे, शिक्षणाचे खासगीकरण, शासकीय शाळा बंद करणे, पारदर्शक पद्धत, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देणे या सर्व मुद्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. दलित, आदिवासी, महिला व अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत आहेत. हे प्रश्न सरकारने त्वरित मार्गी लावावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाकपाने दिला आहे.मोर्चाचे नेतृत्व राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, सचिव जिल्हा कौंसिल मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, जिल्हा सहसचिव शेखर कनोजिया, राज्य कॉन्सिल सदस्य करूणा गणवीर, सी.के. ठाकरे, प्रल्हाद उके, परेश दुरुगवार, छन्नू रामटेके, शंकर बिंझलेकर, अशोक मेश्राम, दुलीचंद कावळे, क्रांती गणवीर, नत्थू मडावी, जितेंद्र गजभिये यांनी केले.