शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मोफत धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांच्या मनात काही तरी वेगळेच असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देग्राहकांची तहसीलदाराकडे तक्रार : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नियमित स्वस्त धान्य देण्याकरिता जे स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वाटप करतात त्याच रेशन दुकानदाराकडून नियमित रेशनच्या व्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु सडक अर्जुनी येथे मोफत तांदूळ वाटप अद्याप सुरु झालेले नाही. ग्राहकांनी विचारणा केली असता ग्राहकांशी उद्धटपणे व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याची लिखित तक्रार गावकऱ्यांनी सडक अर्जुनीचे तहसीलदार उषा चौधरी यांच्या नावे दिली आहे.सडक अर्जुनी येथील शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला मोफतचे प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ मिळेल यासाठी रविवार (दि.१२) सकाळी ९ वाजता एकच गर्दी केली. परंतु स्वस्त धान्य दुकान उघडले नाही. शिधापत्रिकाधारक एक तासापर्यंत स्वस्त धान्य दुकानादाराची वाट बघत होते. त्यानंतर काही ग्राहकांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्या कार्ड धारकांना अरेरावीची भाषा वापरुन धमकी वजा बोलण्यात आल्याचा आरोप केला आहे. शेकडो शिधापत्रिकाधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.परंतु कलम १४४ लागू असल्यामुळे त्यांनी तहसीलदार सडक अर्जुनी यांच्याकडे तक्रार करुन मोफत धान्याचे लवकर वाटप करण्यात यावे. तसेच स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई मागणी केली आहे.तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांच्या मनात काही तरी वेगळेच असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्यांची तक्रार करण्यात येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी पुरवठा अधिकारी देखील काम करतात.लाभार्थ्यांना जर स्वस्त धान्याचा लाभ नियमित व वेळेवर मिळत नसेल तर अशा अधिकाºयांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे व शासनाच्या योजनांचे पालन झाले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.एकच वितरक करतो चार दुकानाचे वाटपवडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारे यांच्या दुकानालाच सडक अर्जुनीचे तीन स्वस्त धान्य दुकान जोडण्यात आले आहे. एकच वितरक चार दुकानाचे वाटप करीत असेल तर एकाच वेळी अनेक शिधापत्रिकाधारकांची गर्दी होईल आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’या नियमांचा फज्जा उडेल. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे तहसील प्रशासन कोणती काळजी घेवून उपाययोजना करतील याकडे देखील नागरिकांचे लक्ष आहे.एकाच स्वस्त धान्य वितरकाकडे वडेगावचे एक आणि सडक अर्जुनीचे तीन स्वस्त धान्य दुकान असल्यामुळे आणि मोफत मिळणारे धान्य उशीरा आल्यामुळे ते शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचले नाही. याची मी लवकरच चौकशी करते. सर्व लाभार्थ्यांना मोफत तांदूळ मिळेल.- उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी 

टॅग्स :Tahasildarतहसीलदार