शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मोफत धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांच्या मनात काही तरी वेगळेच असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देग्राहकांची तहसीलदाराकडे तक्रार : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नियमित स्वस्त धान्य देण्याकरिता जे स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वाटप करतात त्याच रेशन दुकानदाराकडून नियमित रेशनच्या व्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु सडक अर्जुनी येथे मोफत तांदूळ वाटप अद्याप सुरु झालेले नाही. ग्राहकांनी विचारणा केली असता ग्राहकांशी उद्धटपणे व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याची लिखित तक्रार गावकऱ्यांनी सडक अर्जुनीचे तहसीलदार उषा चौधरी यांच्या नावे दिली आहे.सडक अर्जुनी येथील शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला मोफतचे प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ मिळेल यासाठी रविवार (दि.१२) सकाळी ९ वाजता एकच गर्दी केली. परंतु स्वस्त धान्य दुकान उघडले नाही. शिधापत्रिकाधारक एक तासापर्यंत स्वस्त धान्य दुकानादाराची वाट बघत होते. त्यानंतर काही ग्राहकांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्या कार्ड धारकांना अरेरावीची भाषा वापरुन धमकी वजा बोलण्यात आल्याचा आरोप केला आहे. शेकडो शिधापत्रिकाधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.परंतु कलम १४४ लागू असल्यामुळे त्यांनी तहसीलदार सडक अर्जुनी यांच्याकडे तक्रार करुन मोफत धान्याचे लवकर वाटप करण्यात यावे. तसेच स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई मागणी केली आहे.तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांच्या मनात काही तरी वेगळेच असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्यांची तक्रार करण्यात येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी पुरवठा अधिकारी देखील काम करतात.लाभार्थ्यांना जर स्वस्त धान्याचा लाभ नियमित व वेळेवर मिळत नसेल तर अशा अधिकाºयांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे व शासनाच्या योजनांचे पालन झाले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.एकच वितरक करतो चार दुकानाचे वाटपवडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारे यांच्या दुकानालाच सडक अर्जुनीचे तीन स्वस्त धान्य दुकान जोडण्यात आले आहे. एकच वितरक चार दुकानाचे वाटप करीत असेल तर एकाच वेळी अनेक शिधापत्रिकाधारकांची गर्दी होईल आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’या नियमांचा फज्जा उडेल. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे तहसील प्रशासन कोणती काळजी घेवून उपाययोजना करतील याकडे देखील नागरिकांचे लक्ष आहे.एकाच स्वस्त धान्य वितरकाकडे वडेगावचे एक आणि सडक अर्जुनीचे तीन स्वस्त धान्य दुकान असल्यामुळे आणि मोफत मिळणारे धान्य उशीरा आल्यामुळे ते शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचले नाही. याची मी लवकरच चौकशी करते. सर्व लाभार्थ्यांना मोफत तांदूळ मिळेल.- उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी 

टॅग्स :Tahasildarतहसीलदार