शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
5
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
6
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
7
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
8
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
9
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
11
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
12
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
13
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
14
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
16
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
17
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
18
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
19
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
20
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
Daily Top 2Weekly Top 5

चौदव्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम मागीतली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून ती सावरण्यासाठी विविध योजनांच्या निधीला कात्री लावली जात आहे. यासाठी आता चौदव्या वित्त आयोगाच्या निधीवर मिळालेल्या व्याजाची रक्कम शासनाकडे परत पाठविण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने जि.प.पंचायत विभागाला दिले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायती येणार अडचणीत : ग्रामविकास विभागाचे निर्देश, निर्णयाला होतोय विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायतींना ग्राम विकासाचा आराखडा तयार करुन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी चौदव्या वित्त आयोगातंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतींचे महत्त्व वाढले. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून ती सावरण्यासाठी विविध योजनांच्या निधीला कात्री लावली जात आहे. यासाठी आता चौदव्या वित्त आयोगाच्या निधीवर मिळालेल्या व्याजाची रक्कम शासनाकडे परत पाठविण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने जि.प.पंचायत विभागाला दिले आहे.पूर्वी ग्रामपंचायतींना फारच मोजका निधी मिळत होता. परिणामी ग्रामपंचायतींना गावात विकास कामे करण्यास अडचण जात होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रती पदाधिकाऱ्यांमध्ये सुध्दा उदासीनतेची भावना निर्माण होत होती. मात्र जेव्हापासून ग्रामपंचायत १४ वित्त आयोगातंर्गत निधी मिळण्यास सुरूवात झाली तेव्हापासून ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले. तर जि.प.सदस्यांना सुध्दा जि.प.पेक्षा ग्रामपंचायतीमध्ये रुची वाढू लागल्याचे चित्र होते. शासनाने सन २०१९-२० या वर्षांत चौदव्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिला. ग्रामपंचायतींची ९९ टक्के कामे ही १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतूनच केली जात आहे. भरपूर निधी मिळत असल्याने ग्रामपंचायतींना सुध्दा विकास कामे करण्यास मदत होत होती.मात्र राज्यात यंदा मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. परिणामी मागील अडीच महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन आहे.परिणामी सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत सध्या ठणठणाठ असल्याने शासनाने विविध योजना आणि खर्चाला कात्री लावली आहे.तर ३१ मार्चपर्यंत ज्या योजनांचा निधी अखर्चित आहे तो सुध्दा परत मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच अंतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाने जि.प.पंचायत विभागाना पत्र पाठवून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम परत मागविली आहे.एकट्या गोंदिया जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींकडे कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून त्यावरील २० कोटी रुपयांची व्याजाची रक्कम जमा आहे.२० कोटी रुपयांची व्याजाची रक्कम आता शासनाला परत पाठविण्यात येणार आहे. राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती असून सर्वच ग्रामपंचायतीकडे या लेखाशिर्षाचा निधी आहे. त्यामुळे शासनाला या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.निधीचे पत्र नाही व्याजाची रक्कम मागविलीकोरोनामुळे सर्वच विभागांच्या शासकीय खर्चाला कपात लावली जात आहे. त्याच अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतीकडे शिल्लक असलेला निधी शासनाने परत मागविल्याची चर्चा सुरू होती. मात्र सध्या शासनाने केवळ या योजनेच्या निधीवरील व्याजाची रक्कम परत मागविली असल्याचे पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.निधी कपात केल्यास ग्रामपंचायती अडचणीतशासनाने ग्रामपंचायतींना दिला जाणार १४ व्या वित्त आयोगाचा निधी परत मागविल्यास याचा ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर सुरू असलेल्या अनेक विकासात्मक कामांना सुध्दा खीळ बसण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत