शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपती राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देजंगलातील वणव्याच्या घटनांमध्ये वाढ : तीन वन विभागात समन्वयाचा अभाव

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरुवात होताच जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. तेंदूपत्ता आणि मोहफुलाचे संकलन करण्यासाठी नागरिक जंगलामध्येआगी लावतात. मात्र याप्रकारामुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होत असून याला प्रतिबंध लावण्यासाठी वन विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे उघडकीस आली आहे. जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यात संवेदनशील क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध- नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन आणि चिचगड, सालेकसा, तिरोडा, उत्तर देवरी, सडक अर्जुनी, गाेरेगाव, नवेगाव, गोठगाव या वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनांमुळे हजारो हेक्टरमधील वनसंपत्तीचे नुकसान झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. तेंदूपत्ता संकलन आणि मोहफुले वेचण्यासाठी काही जण रात्रीच्यावेळीस जंगलात आग लावत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र आगीमुळे मौल्यवान संपत्ती नष्ट होत आहे. याला प्रतिबंध लावण्यात वन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळ हे तिन्ही विभाग समन्वयाअभावी अपयशी ठरत आहे. 

जिल्ह्यात दररोज वणव्याच्या ३५ घटना जंगलात लागणाऱ्या वणव्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी फाॅरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियातर्फे सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. वणव्याची माहिती फायर वॉचर टीम आणि संबंधित वन विभागाला दिली जाते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात वणवा लागण्याच्या दरराेज ३५ घटना घडत आहेत. वणवा नियंत्रणासाठी ५० फायर वॉचर टीमउन्हाळ्याच्या दिवसात जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी ५० फायर वाॅचर टीम गठित करण्यात आल्या आहे. एका टीमध्ये ३ सदस्यांचा समावेश आहे. वॉच टॉवर, सॅटेलाईट, वनरक्षक, वन मजूर यांचीसुध्दा मदत घेतली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २६ फायर ब्लोअर सुध्दा या टीमला उपलब्ध करुन देण्यात आले. २ एप्रिलला ५० आगीच्या घटनांची नोंद तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलनासाठी काही नागरिक जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस आगी लावतात. शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील जंगलामध्ये ५० ठिकाणी आग लागल्याची घटनांची नोंद झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :forestजंगलfireआग