शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या गोपाळ समाजबांधवांना गावकऱ्यांची अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.

ठळक मुद्देबोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतचे दायित्व : भटक्या गोपाळ समाजाच्या मदतीसाठी पुढे या

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळच्या बोदरा-देऊळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत देऊळगाव येथे भटक्या जमातीमधील ‘गोपाळ’ समाज मागील काही वर्षांपासून ५-६ कुटुंब कायमस्वरूपी वास्तव्याने राहत आहेत. गावोगावी बिºहाड नेऊन अंग मोहनतीचे खेळ दाखवून पोटाची खडगी भरतात. घरातील महिला भगिनी लहान मुलांसह गावा-गावात भिक्षा मागतात यावरच त्यांच्या घरची चूल पेटते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देऊळगाव-बोदरा येथे भटक्या जमातीचे गोपाळ समाजाचे शंकर राऊत, किशोर राऊत, अशोक राऊत,हिरामन नेवारे, दिलीप नेवारे यांच्या ५ कुटुंबात १९ लोक राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी ही लोक आपल्या कुटुंबासह बाहेरी राज्यात जावून पोटाची खडगी भरतात. देऊळगावात कायम स्वरूपी वास्तव्याने असणारा गोपाळा समाज आजही गावात सकाळच्यावेळी भीक्षा मागून दारोदार फिरून मिळेल त्या भिक्षेनी भूक भागवितात. गावात मिळाले त्या कामावर पुरूष मंडळी जातात. मात्र महिला भगिनी दारोदार फिरून भिक्षा पात्रात मिळालेल्या अन्नधान्यावरच त्यांच्या घरची चूल पेटते.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानी गोपाळ समाजाला गावात भिक्षा मागण्यासाठी जाणे सुध्दा आता कठीण झाले आहे. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी सरपंच शंकर उईके पुढे आले. ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित दानदात्यांच्या सहभागाने प्रत्येक कुटुंबाला २० किलो तांदूळ जीवनावश्यक वस्तु रोख स्वरुपात मदत दिली.देऊळगावचे स्वस्त धान्य दुकानदार शामराव झोळे, बोदराचे भागवत झोळे या दोघांनी १०० किलो तांदूळ उपलब्ध करून दिले. अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करताना सरपंच शंकर उईके, उपसरपंच गजानन शहारे, ग्रामसेवक व्ही.आर.ढोक, सदस्य सुनील बनकर, दिनेश चौधरी, योगेश्वर झोळे, देवकाबाई खोटेले, अंगला वटी, जयवंता झोळे, रविना जांभुळकर, सुनिता कांबळे, पोलीस पाटील नचिकेत कापगते, शिक्षक प्रदीप ढवळे, पवन जांभुळकर, वैशाली राऊत, भुमिता शहारे उपस्थित होते.गोपाळ समाजाला नाथाची गरजदररोज गावोगावी फिरून भिक्षा मागणाऱ्या भटक्या जमातीच्या गोपाळ समाजबांधवाची चूल तुमच्या-आमच्या दिलेल्या मुठभर अन्नधान्यावरच पेटली जाते. सर्वत्र संचारबंदीत त्या ५ कुटुंबावर आघात होत आहे. त्यांना या स्थितीत मदतीसाठी आज ‘नाथा’ची गरज आहे. भिक्षा पात्रात आणणे व पानावर खाणारा हा गोपाळ समाज आजच्या परिस्थितीत भरडल्या जावू नये. यासाठी प्रशासनाने सुध्दा त्यांना मदत करण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक