शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

ठरावीक वेळापत्रकातील बसफेऱ्या केल्या जातात रद्द

By admin | Updated: November 19, 2014 22:50 IST

गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही,

देवरी : गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही, असे सांगून यापैकी अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जातात. त्यामुळे देवरी, चिचगड व ककोडीकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे. यासाठी आगार व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या मार्गावर अनेकदा बसेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन ते तीन तास विलंबाने सुटतात. तसेच अनेकदा दोन ते तीन बसेस एकापाठोपाठ एक सुटत असल्याचे चित्र बघायला मिळते. अशावेळी त्या बसेस रिकाम्याच धावत असल्याचेसुध्दा दिसून येते. याप्रकारामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होते. शिवाय एसटी महामंडळाचेसुध्दा नुकसान होते. याकडे एसटी महामंडळाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. याबाबत अनेकदा आगार व्यवस्थापक व भंडाऱ्याचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे प्रवाशांनी व लोकप्रतिनिधींनी लिखीत तक्रारी दिल्या आहे. परंतु वेळापत्रकानुसार बसेसच्या संचालनात कसलीही सुधारणा करण्यात आली नाही. यावरून अधिकाऱ्यांना मनमर्जीने काम करण्याची खुली सुट देण्यात आली तर नाही, असा संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. देवरी तालुका आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुका आहे. शासनाव्दारे आदिवासींच्या उन्नती व प्रगतीसाठी विविध योजना करोडो रुपये खर्च करून राबविल्या जात आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळ कुंभकर्णी निद्रेत असल्याने आदिवासी भागातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोंदिया आगार व्यवस्थापकांव्दारे १६, १७, व १८ नोव्हेंबर रोजी एक अतिरीक्त बस सकाळी ६.३० वाजता गोंदियावरून देवरीसाठी सोडण्यात येत असल्याची चर्चा आहे. परंतु आता गर्दीचे कसलेही सिजन नसताना सदर बसेस का सोडल्या जातात, अशा प्रश्न देवरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेळापत्रानुसार बसेस चालविल्या जात नाही. त्याबाबत चौकशी केली तर बहानेबाजी करून टालमटोल केला जातो. असे असतानाही मग एक अतिरीक्त बस सोडण्यामागे काय कारण आहे, याविषयी चर्चा होत आहे. नवीन आमदार संजय पुराम यांनी या समस्येकडे लक्ष देऊन प्रवाश्यांचे सोईसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी देवरी तालुकावासीयांनी केली आहे.