शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पावसामुळे पाच लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:10 IST

सात महिन्यापासून उचल रखडली: गोदामांची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आदिवासी विकास महामंडळाचा उघड्यावर असलेला पाच लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर आहे. पावसामुळे धानाची भरडाईसाठी उचल करण्यात अडचण निर्माण होत असल्याने या विभागाच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

आदिवासी विकास महामंडळांतर्गत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची खरेदी केली जाते. या विभागाने गेल्या खरीप हंगामात ७ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केला होता. पण राईस मिलर्सने धानाच्या भरडाईवर बहिष्कार टाकल्याने सात महिने धानाची उचल होऊ शकली नव्हती. परिणामी खरेदी केलेला धान तसाच ताडपत्र्या झाकून केंद्रावर पडला होता. तर खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने रब्बीत आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केली नाही. या विभागाने खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था नसल्याने खरेदी केलेला धान तसाच उघड्यावर पडला आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात उघड्यावरील धान खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापैकी आतापर्यंत केवळ २ लाख क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली आहे. पावसामुळे धानाची उचल थांबली असल्याने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पावसामुळे काही प्रमाणात धान खराब होण्याची शक्यता वर्तविली.

दरवर्षी नुकसान तरी धडा नाहीगेल्या २० वर्षापासून आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने धान खरेदी करीत आहे. पण अद्यापही खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान होते. पण यानंतरही या विभागाने धडा घेतला नाही.

चूक शासनाची, भुर्दंड संस्थांनाशासनाच्या लेटलतीफ धोरणामुळे यंदा सात महिने धानाची उचल झाली नाही. परिणामी संस्थांनी खरेदी केलेला धान तसाच पडून होता. त्यामुळे धानात मोठ्या प्रमाणात घट आली. याचा भुर्दंड आता संस्थांना बसत आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया