शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मोफत धान्य वाटप सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचवून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : सुविधांचा अभाव शिधापत्रिकाधारकांची ओरड

राजकुमार भगत।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असून या गावात ३ स्वस्त धान्य दुकान आहे. सध्या ज्या दुकानदाराला ही दुकाने धान्य वाटप करायला दिली होती. त्या दुकानदाराने ग्राहकांशी अरेरावी केल्यामुळे सदर ग्राहकांनी तहसीलदार उषा चौधरी यांच्याकडे तक्रार करुन लोकमत प्रतिनिधीकडे आपली आपबिती सांगितली. दरम्यान या संबंधिचे वृत्त सोमवारच्या (दि.१३) अंकात प्रकाशित होताच सकाळी ९ वाजतापासून मोफत धान्य वाटपाला सुरुवात केली.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचवून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.बऱ्याच स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडून मिळणारे मोफत तांदूळ वाटप करायला सुरुवात केली होती. परंतु सडक-अर्जुनी येथे १२ एप्रिलपर्यंत मोफत तांदूळ वाटप करण्यात आले नव्हते. ग्राहकांनी भ्रमणध्वनीद्वारे वितरकाला तांदूळ वाटपाबाबत विचारणा केली असता त्याने ग्राहकांनाच िअरेरावीची भाषा वापरुन अपमानित केले. याची आपबिती शिधापत्रिकाधारकांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.दरम्यान यासंदर्भातील वृत्त सोमवारी प्रकाशीत होताच स्वस्त धान्य दुकानदाराने अन्नधान्याचे वाटप करण्यास सकाळपासूनच सुरूवात केली. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.मोफत तांदूळ लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्वस्त धान्य वाटप करणाºया दुकानदारांकडून ग्राहकांना सुविधा मिळते किंवा नाही याची चौकशी प्रशासनाने करणे गरजेचे आहे.लाभार्थ्यांनी मानले लोकमतचे आभारशासनाकडून मिळणारे प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ आता आपल्याला मिळणार किंवा नाही अशा मनस्थितीत शिधापत्रिकाधारक होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मोफत धान्य वाटपाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक नागरिकांनी भ्रमणध्वनीवरुन फोन करुन लोकमतचे आभार मानले.सुविधांचा अभाववडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार सडक-अर्जुनी येथील ३ दुकानाचे वाटप एकाचवेळी करीत असल्यामुळे ग्राहकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय शिधापत्रिकाधारकांना उन्हात उभे राहावे लागते.तिथे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. मंडप,पिण्याचे पाणी, सॅनिटायझर या सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक